Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूरमध्ये वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं, 4 गावातील ग्रामस्थांचा थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलनImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 4:41 PM

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) वीज तोडणी मोहीम महावितरणनं हाती घेतली आहे. महावितरणनं (Mahavitran) शेतकऱ्यांना (Farmers) कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा, बीड, वाशी गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने गावकरी आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले.

चार गावातील ग्रामस्थ आक्रमक

महावितरणनं कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ झाले होते. कोणतिही पूर्वसूचना न देता वीज कापल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते. महे, कसबा, बीड आणि वाशी गावातील ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर, महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील धारेवर धरलं.

कोल्हापूरमधील काही भागात वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. महावितरणच्या या मोहिमेविरोधात ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.  वीज कनेक्शन तोडायचं म्हणलं तर रितसर नोटीस द्यावी लागते. मात्र, सध्या महावितरणकडून सुरु असलेला प्रकार चुकीचा असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात खडाजंगी

गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

इतर बातम्या: 

बारावीच्या केमिस्ट्रीचा पेपर फुटीचा प्रकार नाही , तर कॉपीचा प्रकार- बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी

दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस, जालन्यात नाभिक समाज आक्रमक, काय आहे मागणी?

Kolhapur farmers reach to Mahadiscom office due to cut electricity without any information

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.