Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील बहुतांश धरणं भरली, काही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

जुलै महिन्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरण भरली आहे. तर काही धरणं भरण्याच्या उंबठ्यावर आहेत.

महाराष्ट्रातील बहुतांश धरणं भरली, काही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
धरण
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 12:46 PM

महाराष्ट्र : मागच्या महिन्यात महाराष्ट्रात (maharashtra rain update) अधिक पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rain in maharashtra) झाल्याचं पाहायला मिळालं. जून महिन्यात अजिबात पाऊस न झालेल्या भागात इतका पाऊस झाला की, नदी नाल्यांना पूर आला. महाराष्ट्रातील अनेक धरणं (maharashtra dam water level) मुसळधार पावसामुळे भरली आहेत. तर काही धरण भरण्याच्या उंबठ्यावर असल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक धरण पुर्णपणे क्षमतेने भरली आहेत. विशेष म्हणजे ज्या धरणांचा पाणीसाठा मोठा आहे. ती धरण भरण्याच्या उंबठ्यावर आहेत.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. परंतु जुलै महिन्यात अनेक धरणं भरल्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी अनेक धरण भरली आहेत. तर काही धरण भरण्याच्या उंबठ्यावर आहेत. सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरण 72 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे सांडव्याचे चारही दरवाजे खुले करण्यात आले आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्याने काठावरील स्थलांतरीत गावातील प्राथमिक शाळेची जुनी इमारत मंदिरे पाण्यात गेली आहेत.

हे सुद्धा वाचा

भंडारदरा धरण पुन्हा एकदा 15 ऑगस्ट पूर्वीच तुडूंब भरले असून निळवंडे धरण देखील 85 टक्के भरले आहेत. धरणाच्या दरवाज्यातून प्रवरा नदीच्या पात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. भंडारदरा परिसरात पावसाची अजूनही रिपरिप सुरू आहे. निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यंटकांची मोठी गर्दी पहायला घटनास्थळी पाहायला मिळत आहे. जिल्हयात मात्र पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात सापडली आहेत. पाऊस न पडल्यास पिकांना धोका होण्याची शक्यता आहे.

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.