Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचं संकट टळलं, राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के जलसाठा

राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे (Water Storage In All Dams). सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे.

आनंदाची बातमी! यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचं संकट टळलं, राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के जलसाठा
Water Storage In Dams
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 10:21 AM

नागपूर : राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे (Water Storage In All Dams). सध्या राज्यातील धरणांमध्ये 47.72 टक्के पाणीसाठा असल्याने आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उकाड्यातही यंदा बहुतांश भागातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाहीये (Maharashtra Water Problem Solved 47.72 Percent Water Storage In All Dams).

नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 50 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील धरणांमध्ये 7 टक्के जास्त पाणीसाठा आहे. ही राज्यातील जनतेसाठी आनंदाची बाब आहे.

मे महिना उजाडला की राज्यातील बरीच धरणं तळाला लागलेली असतात आणि या भागात पाणीटंचाईचं संकट उभं राहतं. पण, यंदा चित्र सकारात्मक आहे. धरणं निम्मे भरलेली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची आता माहाराष्ट्राच्या जनतेला चिंता नाही.

राज्यातल्या कुठल्या विभागातील धरणात किती पाणीसाठा आहे? पाहुयात –

राज्यातील लघू, मध्यम, मोठ्या धरणातील पाणीसाठा किती?

विभाग सध्याचा पाणीसाठा
अमरावती51.82 टक्के
नागपूर 52 टक्के
औरंगाबाद58.35 टक्के
कोकण51.35 टक्के
नाशिक48.29 टक्के
पुणे39.12 टक्के
एकूण पाणीसाठा47.72 टक्के

राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून सध्या 47.72 टक्के पाणीसाठा आहे. काही धरणं निम्म्यापेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे राज्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा मे महिन्याच्या उकाड्यातंही राज्याची पाण्याची चिंता मिटली आहे.

Maharashtra Water Problem Solved 47.72 Percent Water Storage In All Dams

संबंधित बातम्या :

Weather report : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, कुठं शेतीचं नुकसान, तर कुठं वीज पडून मृत्यू

Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', पराबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.