Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 जानेवारीला मुंबईत भगवं वादळ; मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन काय?

20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास करून मनोज जरांगे मुंबई गाठणार आहेत. मुंबईत भगवं वादळ धडकणार आहे. यामुळे मुंबईकरांची कोंडीही होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी मुंबईकरांना कळकळीचे आवाहन केले आहे.

20 जानेवारीला मुंबईत भगवं वादळ; मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईकरांना कळकळीचं आवाहन काय?
मनोज जरांगेImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 12:54 PM

मुंबई :  मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि छगन भुजबळ यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहे, तर दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं छगण भुजबळ वारंवार सांगत आहेत.  पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोघांचेही एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू आहे. नुकतीच मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. ‘लैच कामातून जायचं अंदाज दिसतो. सुसंस्कृत पणा तुमच्याकडून काय शिकवा? आता तुम्ही सुधारा. माणूस पागल होईल अस वाटायलं. तुम्ही मला संस्कृती शिकवाल? कोयते कुऱ्हाडी काढणारे. काय संस्कृती आहे तुम्हाला? धनगर समाजाचा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा. आता कागद खाईल हा माणूस.’ असं जरांगे पाटील म्हणाले.

भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही

सरकारणं सांगितलं कायदा पारित करायला वेळ द्या. आम्ही नोंदी कायदा पारित करण्यासाठी 40 दिवस दिले. मात्र सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही. आता आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. मी 20 जानेवारीला मुंबईला पायी निघणार आहे. 25 डिसेंबरला निघालो असतो तर दोन दिवसांता परत आलो असतो. भावनेच्या आहारी जाऊन काही निर्णय घेऊन समाजाची फसगत करायची नाही. तिथ जाऊन जिंकून यायचं आहे. असं मनोज जरांगे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुंबईकरांना मनोज जरांगेंचं आवाहन

20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास करून मनोज जरांगे मुंबई गाठणार आहेत. मुंबईत भगवं वादळ धडकणार आहे. यामुळे मुंबईकरांची कोंडीही होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी मुंबईकरांना कळकळीचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांचं मुंबईकरांनी स्वागत केलं पाहिजे असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईकरांनी आम्हाला ग्लास भरून पाणी दिलं पाहिजे. मुंबईकर आमचं गाऱ्हाणं करणार नाही असं ही ते म्हणाले. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरही त्यांनी टिपणी केली. मागास आयोगाने जाचक अटी लावण्याचं कारण नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?
तहव्वूर राणाला भारतात आणणार; काय म्हणाले उज्ज्वल निकम?.
ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, रस्त्यावर पेटवली चूल अन् थापल्या भाकऱ्या
ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, रस्त्यावर पेटवली चूल अन् थापल्या भाकऱ्या.
सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला
सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला.
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला.
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप.
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला.
MSRTC : '... अन्यथा आंदोलन करणार', एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा
MSRTC : '... अन्यथा आंदोलन करणार', एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा.
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.