Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला ‘ही’ नावं द्या!

मुंबई: शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही नामांतर वादात उडी घेतली आहे. अबू आझमींनी […]

अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला 'ही' नावं द्या!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई: शहरांच्या नावाच्या नामांतराचा मुद्दा देशभर गाजत आहे. नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी झाली. विविध पक्ष, संघटनांनी शहरांची नावं बदलण्याची मागणी केली. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही नामांतर वादात उडी घेतली आहे. अबू आझमींनी नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी केली. या तीनही शहरांना अबू आझमींनी नवी नावं सूचवली आहेत.

नवी मुंबई शहराचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करा, ठाण्याचं नाव जिजामाता आणि पुण्याचे नाव छत्रपती संभाजी महाराज करा, असं अबू आझमी विधानसभेत म्हणाले. अबू आझमींनी थेट विधानसभेतच ही मागणी केली.

अबू आझमी म्हणाले, “नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, ठाण्याला जिजाबाईंचं तर पुण्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या”

शहरांच्या नामांतराचं वारं

यापूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी ही भूमिका मांडली आहे. “योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे अयोध्या केले, अलाहाबादचे प्रयाग तिर्थ केले, मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार? असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 7 नोव्हेंबर रोजी केलं होतं.

त्यानंतर पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली. याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं जाणार आहे. राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव आणि पुणे शहराचे ‘जिजापूर’ करावं, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पुणे शहराला जिजाऊंचा वसा आणि वारसा असल्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून मागणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात शहारांची नावं बदलली 

 उत्तर प्रदेशात शहरांची नावं बदलण्याचा सपाटा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. नुकतंच फैजाबाद शहराचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर यानंतर अनेक शहरांची नावं बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या 

पुण्याचं नाव जिजापूर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी  

‘औरंगाबादचं संंभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव करा’

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....