Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा

दांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे खोटं बोलतात, त्याचं तोंड विना फेव्हिकॉलचं बंद होणार, आदित्य ठाकरेंवर या नेत्यांनी साधला निशाणा
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 7:22 PM

मुंबईः वेदांता प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना आव्हान देत आपल्यासोबत वेदांतावरून डिबेट करा असं जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खोटं बोलत आहे असा आरोप भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वेदांता प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.

ठाकरेंवर टीका करताना आमदार आदित्य ठाकरे खोटं बोलतात अशी थेट टीका केली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आदित्य ठाकरे यांनी जर पुरावे दिले नाही तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विनाफेव्हिकॉलचं बंद होई असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वेदांता प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये यावरून त्यांनी प्रश्न उपस्थित करावा आणि जर सरकारने जर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

तर मात्र सरकारचं तोंड बंद होईल आणि उत्तर दिले गेले तर आदित्य ठाकरे यांचे तोंड विना फेव्हिकॉल बंद होईल असंही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका करताना त्यांनी ठाकरे गट आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारवर खोटेनाटे आरोप करत आहे असा आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातच गेले नाहीत. त्यामुळे वेदांताविषयी चर्चा कोणाबरोबर करणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

मागच्या सरकारच्या काळात वेदांता प्रकल्पासाठी कुठेही जागा मिळाली नाही, त्यांच्याबाबत कुठेही बैठका झाल्या नाहीत, वेदांता प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या अकार्यक्षमतेमुळे राज्याबाहेर गेला आहे.

त्यातच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात गेले नाहीत, त्यामुळे कोणाबरोबर बैठका घ्यायच्या हा प्रश्न होता. आदित्या ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा खोटारेडापणा आहे,

आपल्या काळात त्यांनी काय केले नाही म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी असे खोटेनाटे आरोप केले आहेत अशी टीका आता चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्याता आली आहे.

गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव.
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले.
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध.
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.