Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu : मंत्रीपद हा आमचा अधिकार, अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास; मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्यानं बच्चू कडूंची नाराजी

आमचा प्रहार पक्ष आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही. त्यामुळे निश्चितच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता, असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : मंत्रीपद हा आमचा अधिकार, अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास; मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्यानं बच्चू कडूंची नाराजी
बच्चू कडू/एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 11:03 AM

मुंबई : मंत्रीपद हा आमचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आणि शिंदे गटाचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांचे नाव नाही. यावरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात कोणत्याही अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात (Cabinet expansion) स्थान देण्यात आलेले नाही. राजभवनातील (Raj bhavan) दरबार हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये संदिपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, गुलाबराव पाटील, संजय राठोड अशा विविध नेत्यांची नावे दिसत आहेत. आता यावरून बच्चू कडू नाराज असल्याचे दिसत आहे.

‘दोन पावले मागे यावे लागते’

आमचा प्रहार पक्ष आहे. मित्रपक्षांशिवाय सरकार चालत नाही. त्यामुळे निश्चितच यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता. तसेच येणाऱ्या विस्तारात मंत्रीपद देऊ, असे ते म्हणाले होते. मात्र, काही तांत्रिक कारण असेल. त्यामुळे अपक्षांना मंत्रीपद देण्यात आलेले नाही. कधी-कधी दोन पावले मागे यावे लागते. त्यामुळे अजूनही त्यांच्या शब्दावर विश्वास आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले बच्चू कडू?

‘विचार करावाच लागेल’

मी तरी मनावर घेत नाही. विविध योजनांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मंत्रीपद तर आमचा अधिकार आहे, तो आम्ही मिळवणारच. मात्र सोबतच जनतेची कामेही महत्त्वाची आहेत. विविध कामे आहेत. त्यामुळे हे सरकार अपक्षांशिवाय राहू शकत नाही. मोठी संख्या आहे. त्यांना आमचा विचार करावाच लागेल. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते, असे अनेक आमदारांना निमंत्रण न मिळाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. तसेच त्यांनी शब्द दिला आहे. त्यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी आपल्याला म्हटल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.