Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट

बेस्ट बसने नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांना 'बेस्ट' दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट
Follow us
| Updated on: Jun 21, 2019 | 11:55 AM

मुंबई : बेस्ट बसने नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने हा नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे.  त्यानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले आहे. साध्या बससाठी पहिल्या 5 किमीला 5 रुपये तर एसी बससाठी 6 रुपये किमान तिकीट दर असेल.

या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी 600 कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले आहे. मात्र तीन महिन्यांत बदल दिसले पाहिजेत, अशी अट घालताना बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश करारात आहेत. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.  त्यानुसार बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे.

नवीन प्रस्तावानुसार प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहतील. आज बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा होईल आणि मंजुरीनंतरच नवीन भाडे लागू होणार आहे.

नव्या भाडेदर प्रस्तावानुसार चार टप्प्यानुसार तिकीट दर ठरवण्यात येतील. त्यानुसार 5 किमी, 10 किमी, 15 किमी आणि त्यापुढे असे हे चार टप्पे असतील. त्यानुसार 5 किमीपर्यंत 5 रुपये, 10 किमीपर्यंत 10 रुपये, 15 किमीला 15 रुपये आणि त्यापुढील टप्प्याला 20 रुपये तिकीट दर असेल.  एसी बसचे प्रवास आणि तिकीटाचे टप्पे वेगळे असतील.

संबंधित बातम्या 

मुंबई : बेस्ट बस वाचवण्यासाठी खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हटके आयडिया   

 ‘या’ 10 निकषांवर ‘बेस्ट’चा संप मागे 

एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.