निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले….

राज्यात विधीमंडळाचं अधिवेशन 27 जून म्हणजेच उद्या गुरूवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या एक दिवसाआधी सत्ताधारी विरोधकांना चहापानाचं निमंत्रण देतात. पण चहापानावर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतली.  यावेळी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

निरोपाचं अधिवेशन म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले....
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 8:48 PM

पावसाळी अधिवेशनाआधीच सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. या अधिवेशनावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे  काय म्हणाले?

निरोप द्यायला सभागृहात यावं लागणार की नाही. का फेसबुक लाईव्हवरून देणार आहात? निरोप द्यायचा की घ्यायचा आहे हे जनता ठरवत असते. आम्ही जनतेची सेवा केली असून आम्ही रस्त्यावरील आणि जमीनीसोबत जोडलेले कार्यकर्ते आहोत. जिथे जिथे आपत्ती येते तिथे आम्ही जातो, घरात नाही बसत. त्यामुळे लोकांना माहित आहे की काम करणार सरकार कोण आहे आणि फक्त खोटे आरोप करणार सरकार कोण आहे .शेवटच्या अधिवेशनात सर्वांनी भाग घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संविधान कधी बदलणा आहे का? आपलं संविधान हे जगात सर्वोत्तम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर संविधान कपाळाला लावलं आहे. बाळासाहेबांना काँग्रेसने दोनवेळा हरवलं, बाळासाहेब बोलायचे काँग्रेसचं जळकं घर आहे त्याच्यापासून दूर राहा. मोदींनी 2015 पासून संविधान दिन सुरू केला. मुंबईमधील इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असं स्मारक उभारत आहोत. जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाहीत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सर्वात जास्त पेपरफुटी  ठाकरे मुख्यमंंत्री असताना झाली- फडणवीस

सर्वात जास्त पेपरफुटी ही उद्धव ठाकरे मुख्यमंंत्री असताना झाली आहे. आता ते आम्हाला विचारत आहेत, जितक्या परीक्षा घेतल्या त्याचे रिपोटकार्ड आम्ही अधिवेशनात दाखवू. परकीय गुंतवणुकीत आमच्या काळात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. विरोधकांनी प्रकल्पांवरून खोटा नरेटिव्ह सेट केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.