Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवरून महाविकास आघाडीत घमासान; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या मागणीने काँग्रेसला फुटला घाम

Mahavikas Aaghadi Seat Sharing : मुंबईवरुन महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबईतील 36 विधानसभा जागांवरुन पेच निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईवरून महाविकास आघाडीत घमासान; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या मागणीने काँग्रेसला फुटला घाम
मुंबईत कोण मोठा भाऊ?
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 10:38 AM

मुंबईचं वातावरण महाविकाससाठी अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीसाठी लोकसभेसारखेच आव्हान कायम असल्याचे ते म्हणाले. पण सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मुंबईतील 36 विधानसभा जागांवरुन पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याकडील जागांचे गणित पाहता काँग्रेसे आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काय आहे पेच

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील 36 विधानसभा जागांपैकी 21 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. या सर्व कवायतीत काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 8 जागा उरत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट, वर्सोवा, कुर्ला, अणुशक्ति नगर, दहिसर, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करत आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचा दावा काय?

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 288 पैकी 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा काँग्रेस नेत बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी, 12 सप्टेंबर रोजी केला. महाविकास आघाडीत राज्यातील 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तर इतर जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत चमत्कार करण्यासाठी चंग बांधला आहे.

मुंबईत महाविकास आघाडी मजबूत

दरम्यान नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुंबईत महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे, असा दावा केला आहे. मुंबईत महायुतीसाठी आव्हान उभं राहिले असे ते म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर  महायुतीसाठी कोणतीही जागा अजिंक्य नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तर महाविकास आघाडी विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले.

बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...