Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मनुस्मृतीविरोधात आता स्त्रियांनीच उठाव करावा”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या ग्रंथातील महिलांचं स्थान दाखवलं

मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीविरोधात आता स्त्रियांनीच उठाव करावा; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या ग्रंथातील महिलांचं स्थान दाखवलं
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 12:13 AM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत आले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची आव्हाडांच्या मुलीला आणि त्यांच्या जावयाला मारण्याच्या धमकीमुळे राजकीय वातावरण तापले होते. तर आज बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची एक जाहिरात आली आहे, प्रोजेक्ट फेलोशिपसाठी ‘Applocability of Manusmruti in Indian Society’ या जाहिरातीमुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी विरोधसकांसह मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या जाहिरातीबद्दल बोलताना त्यांना म्हटले आहे की, मनुस्मृतीची ही संकल्पांना संविधानाने बाहेर फेकली आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करताना महाडमध्ये मनुस्मृती जाळून त्याबद्दल आपला राग व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मनुस्मृतीवर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी त्या मनुस्मृतीचा इतिहास सांगितला आहे. मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीनुसार स्त्री ही वासनेने वखवखलेली असते. त्यामुळे तुम्ही मनुस्मृतीचं स्वागत करणार असाल, तर आपल्या आईबद्दल असा विचार कराल का असा सवाल उपस्थित करून त्यांनी स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू असते असं मननस्मृतीत सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर मनुस्मृतीमध्ये दलित, क्षुद्र यांच्याबद्दल काय त्यामध्ये काय म्हटले आहे त्याबद्दल सोडून दिलेलेच बरे आहे. मात्र आईच्या मनात वासना असते हे म्हटलेलं कुणाला आवडेल? असा सवाल जितेद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

ज्या मनुस्मृतीने चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन केले आहे, स्त्रीयांना हीन लेखले आहे. त्या – मनुस्मृतीची चिरफाड करून बाबासाहेबांनी संविधान आणलं आहे.

भारतात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि जो पाश्चिमात्य देशात उशिरा मिळाला. त्यामुळे आता याविरोधात स्त्रियांनी उठाव केला पाहिजे असे आवाहन करत त्यांनी मनुस्मृती स्त्रियांना स्थानच देत नसल्याने त्याचा विचार आता महिलांनी करणे गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.