Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget Session 2023 | राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेची घोषणा

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या धर्तीवर एका योजनेची घोषणा केली आहे.

Maharashtra Budget Session 2023 | राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेची घोषणा
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 3:20 PM

मुंबई | एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारकडून पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडला. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी केंद्राच्या धर्तीवर एका योजनेची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासंघ निधी’ (Namo Saaman Yojana) योजनेची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अर्थमंत्री काय म्हणाले?

“आज मात्र हवामान बदल अवकाळी अवर्षण अशा असंख्य समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले तरी त्याला हक्काच्या मदतीची आम्ही आवश्यक आहे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासंघ निधी’ ही योजना मी जाहीर करतो”, असं फडणवीस यांनी जाहीर केलं.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा

“केंद्र सरकारच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी 6000 रुपयात राज्य सरकार आणखी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबाला त्या ठिकाणी होणाऱ्या या सिटी सन 2023 24 मध्ये सहा हजार नऊशे कोटी रुपये इतका नियम प्रस्तावित आहे केंद्र सरकारच्या 2016 च्या प्रधानमंत्री पिक विमा योजना दोन टक्के रक्कम शेतकऱ्याने भरण्याची तरतूद आहे”, असं फडणवीस यांनी नमूद केलं.

असा होणार फायदा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेनुसार शेतकऱ्यांना दरवर्षी 2 हजार रुपयांच्या एकूण 3 हफ्त्यांमध्ये 6 हजार रुपये मिळतात. आता त्यात राज्य सरकारने भर घातली आहे. राज्य सरकारकडून 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ यानुसार प्रति शेतकरी दरवर्षी 6 हजार रुपये मिळतील. शेतकऱ्याला अशाप्रकारे केंद्र आणि राज्य सरकारडून एकूण 12 हजार रुपयांचं लाभ मिळणार आहे.

साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.