Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याचं खरं कारण काय?; शंभुराज देसाई यांनी सांगितली आतली बातमी

Shambhuraj Desai on Eknath Shinde : दिल्लीहून परतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक त्यांच्या दरे गावी गेले. त्यांचे गाव दुर्गम भागात आहे. गावात पोहचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद टाळला आणि ते थेट त्यांच्या घरी गेले. त्यावरून आता राज्यात चर्चेचे पेव फुटले आहेत.

एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याचं खरं कारण काय?; शंभुराज देसाई यांनी सांगितली आतली बातमी
शिंदे खरंच नाराज? काय म्हणाले देसाई
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 3:39 PM

दिल्लीहून परतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक त्यांच्या दरे या गावी गेले. त्यांचे गाव दुर्गम भागात आहेत. गावात पोहचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. ते थेट त्यांच्या घरी गेले. शिंदे यांच्या या भूमिकेने राज्यात चर्चेचे पेव फुटले आहेत. एकनाथ शिंदे दरे गावात जाण्याचं खरं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी शंभुराज देसाई यांनी त्याविषयीची आतली बातमी सांगितली.

रोहित पवार यांना निराशा

महाराष्ट्राच्या जनतेने लोकशाही मार्गाने महायुतीला स्वीकारलेला आहे, महाविकास आघाडीला झिडकाडलं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले. रोहित पवार यांना यातून निराश आलेला आहे, त्यापोटी ते असे आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार पाच वर्षे विधिमंडळात आहेत. हुंडाबळी चा कायदा देखील या ठिकाणी आहे त्याची कल्पना त्यांना नसेल त्यांची प्रत त्यांना पाठवतो. आमच्या घरात डोकावून बघू नये. महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता कोण होणार त्याकडे लक्ष द्या. आमच्या मुला-मुलीकडेकडे लक्ष द्यायलाची तुम्हाला गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे का गेले गावी?

एकनाथ शिंदे हे अचानक गावी गेल्याने माध्यमात त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमातील चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही असा उत्तर दिले. तर एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी का गेले, यावर शंभुराज देसाई यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना थोडा त्रास होत आहे त्यामुळे आम्ही त्यांना आग्रह केला थोडा आराम करण्यासाठी म्हणून ते तिकडे गेले आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. एकनाथ शिंदे उद्या मुंबई परततील. कुठल्याही गोंधळात ते नाही. जे त्यांच्या पोटात ते त्यांच्या ओठात येते. एकनाथ शिंदे महायुती सोबत आहेत आणि महायुती जो निर्णय घेईल. त्यांच्याबरोबरच ते राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री यांच्याकडे गृहखात होतं. तसंच यावेळी व्हावे. मात्र याच्यावर केंद्रतील नेते अमित शहा यांच्यासोबत सल्ला घेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निर्णय घेतील, असे देसाई म्हणाले. महायुती मध्ये मंत्री पदाच्या संख्या आणि खाते वाटप साठी कुठलाही रस्सीखेच आणि तणाव नाही. आमचे 63 आमदारांनी हा ठराव केलेला आहे पण त्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या बैठक आहे. त्यांचा नेता निवडीसाठी आणि तो झाल्यानंतर सरकार विस्तार प्रक्रियेला गती मिळेल असे त्यांनी सांगीतले.

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.