Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, बाळा नांदगावकरांचा सल्ला

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. (Bala Nandgaonkar Maharashtra Lockdown)

लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा, बाळा नांदगावकरांचा सल्ला
बाळा नांदगावकर, मनसे नेते
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 6:21 AM

मुंबई : राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. गेल्या फेब्रवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध घातले जात आहे. यावरुनच बाळा नांदगावकरांनी ट्वीट करत राज्य सरकारचे कान टोचले आहेत. (MNS Bala Nandgaonkar On Maharashtra Lockdown)

राज्य सरकारने सरसकट लॉकडाउनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये. त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा. तसेच बाकी अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रापेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत, तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. हा ही सरकारसाठी संशोधनाचा विषय आहे. ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावे. आधीच आर्थिकदृष्टया त्रस्त जनतेला लॉकडाऊन करून अडचणीत आणू नये, असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

बाळा नांदगावकरांचे ट्वीट 

कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन? 

राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद याशिवाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.

  • परभणी जिल्ह्यात 2 दिवसांचा लॉकडाऊन
  • नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
  • जळगाव जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू
  • मीरा भाईंदरमध्ये कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर

राज्यातील कोरोना स्थिती काय? 

राज्यात काल (12 मार्च) 15 हजार 817 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 82 हजार 191 इतकी झाली आहे. तर राज्यात आज 56 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.31 % एवढा आहे.

राज्यात काल 11,344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर राज्यात आजपर्यंत एकूण 21,17,744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.79% एवढे झाले आहे. (MNS Bala Nandgaonkar On Maharashtra Lockdown)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown | कुठे लॉकडाऊन, कुठे Night Curfew, कुठे कडक निर्बंध, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

चिंतेची बाब! कोरोनाचा विळखा वाढला, राज्यात 15 हजार 817 रुग्ण सापडले

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.