Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास ‘वर्षा’वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग

Mahayuti Meeting For Vidhansabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रातील आढाव्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास 'वर्षा'वर खलबतं झाली. महायुतीच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाली. वाचा सविस्तर बातमी...

महायुतीच्या जागावाटपाबाबत 5 तास 'वर्षा'वर खलबतं; निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 8:06 AM

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. पाच तास ही खलबतं झाली. यात आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा झाली. कोण किती जागा लढणार? कोणती जागा कुणाकडे असणार? यावर या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली.

‘वर्षा’वर महायुतीची बैठक

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली. त्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीची काल बैठक झाली. पाच तास जागावाटपावर चर्चा झाली. त्यामुळे आता महायुतीचं जागावाटप कधी जाहीर होतं हे पाहावं लागेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचा अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती. हा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत आले. त्यानंतर वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाने जी काही नियमावली आहे. त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये नियमाने कामकाज झालं पाहिजे. नियमाने लोकशाहीमध्ये निवडणूक झाली पाहिजे, त्याप्रमाणे निवडणूक आयोग काम करतोय. लोकशाहीमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्यांनी असंही म्हटलं आहे की मागच्या निवडणुकीत लोकांना त्रास झाला, गैरसोय झाली. ती यावेळी होता कामा नये निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला आहे, त्यांचं स्वागत करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.