Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुणे फक्त 30 मिनिटात, या वर्षाअखेर हायपरलूपच्या कामाला सुरुवात

महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे प्रवास कमीत-कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम यावर्षीच्या अखेरपर्यंत सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे फक्त 30 मिनिटात, या वर्षाअखेर हायपरलूपच्या कामाला सुरुवात
Follow us
| Updated on: Jun 11, 2019 | 11:18 PM

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबई-पुणे प्रवास कमीत-कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम यावर्षीच्या अखेरपर्यंत सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे काम करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप वन (Virgin Hyperloop One) या अमेरिकन कंपनीचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक हर्ज धालिवाल कन्स्ट्रक्शन वीकला याविषयी माहिती दिली.

मुंबई-पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त 25 मिनिटात पूर्ण करता येईल. म्हणजे मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास वाचणार आहेत. पुणे आणि मुंबईमधील अंतर 150 किलोमीटर आहे. या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार

मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ असणार आहे. त्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी व्हर्जिन हायपरलूप वन कंपनी 500 मिलियन डॉलरची खासगी गुंतवणूक करणार आहे.

पहिल्या टप्प्यातील कामात जमीन अधिग्रहणासाठी कोणतेही अडथळे नसल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास कोणताही विलंब होणार नाही. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम सुरु करण्यात येईल. यात मुंबई ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि नवी मुंबई अशा मार्गांच्या कामाचा समावेश असेल.

वाहतुकीसाठी चुंबकीय क्षेत्र आणि हायपरलूप वाहनाचा उपयोग

मुंबई-पुणे हायपरलूप मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरुनच समांतर जाईल. हायपरलुप वाहतूक सध्याची आधुनिक प्रकारातील वाहतूक मानली जाते. याद्वारे कमीत कमी वेळात प्रवाशांना एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता येते. ही वाहतूक विशेष अशा हायपरलुप वाहनातून कमी दाबाच्या ट्युबमध्ये वीजेच्या वेगाप्रमाणे होते. हे वाहन चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करुन ट्रॅकच्या वर तरंगत प्रवास करते.

प्रत्येकवर्षी 20 कोटींपर्यंत प्रवाशी मुंबई-पुणे प्रवास करतील, असा अंदाज आहे. ही गरज लक्षात घेऊन इतरही काही प्रकल्प सुरु करण्याचा विचार होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या नव्या वाहतूक मार्गाची सार्वजनिक वापरासाठीची व्यवहार्यता आणि सुरक्षितता राज्य सरकारला पटवून देण्यासाठी हा पहिला प्रकल्प ही कंपनी करत आहे.

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.