AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : जुन्या संसदभवनात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ कुणीही टिकत नव्हतं, म्हणूनच…; सामनातून मोदी सरकारवर निशाणाा

Saamana Editorial on PM Narendra Modi : ज्योतिषाच्या सल्ल्यानेच नवी संसद उभारली. जुन्या संसद भवनात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ कुणीही टिकत नव्हतं, म्हणून सारा घाट घातला!, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा.

Sanjay Raut : जुन्या संसदभवनात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ कुणीही टिकत नव्हतं, म्हणूनच...; सामनातून मोदी सरकारवर निशाणाा
| Updated on: Sep 24, 2023 | 8:44 AM
Share

मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारकडून नवं संसद भवन उभारण्यात आलं आहे. या इमारतीचं काही दिवसांआधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर आता या इमारतीत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनात पार पडला. मात्र दुसऱ्या दिवसापासून नव्या संसद भवनात कामकाज सुरु करण्यात आलं. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येतेय. ठाकरे गटाने नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सामनातील या ‘रोखठोक’ सदराच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

ऐतिहासिक संसद भवनास टाळे लागले आहे. तेथे संविधानाचे म्युझियम वगैरे होईल असे सांगितले जाते. नवी इमारत म्हणजे आज तरी गोंधळ दिसत आहे. तेथे इतिहास घडेल काय? त्यासाठी लागणारी टोलेजंग व्यक्तिमत्त्वेच आज नाहीत! जुन्या संसद भवनास विसरता येणे कठीण आहे.

राजधानी दिल्लीतील हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान शंभर वर्षे त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक संसद भवना’ला टाळे लावले व त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले. 20 तारखेला विशेष अधिवेशनासाठी मी नव्या संसद भवनात पोहोचलो तेव्हा बाहेर व आत एकंदरीत गोंधळाचेच चित्र होते. जुन्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी लोकसभा तसेच राज्यसभेसाठी स्वतंत्र भव्य दरवाजे होते.

लोकसभेसाठी इतर ‘दोन’ दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच ‘दार’. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते. आत शिरताच एका परिचित पत्रकाराने विचारले, “नवे संसद भवन कसे वाटले?” “हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला शोभेल असे हे संसद भवन अजिबात वाटत नाही. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या लोकशाही मंदिरात प्रवेश केल्यासारखे वाटत नाही,” असे माझे त्यावर उत्तर होते.

दिल्लीत सध्या घामाच्या धारा वाहत आहेत असा उन्हाळा आहे. त्या उन्हात खासदार व कर्मचारी आत शिरण्यासाठी उभे आहेत. लोकसभेला आधी होते तसे दिमाखदार पोर्च येथे नाही. जुने संसद भवन व्यवस्थित आहे. तरीही समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून त्यावर सरकारी तिजोरीतून 20 हजार कोटी रुपये उधळले. हा सर्व अट्टहास कशासाठी?

“स्वातंत्र्यानंतर या इमारतीस संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता है खरे आहे, पण या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम, मेहनत आणि पैसाही आपल्या देशाने गुंतवला,” असे पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या निरोपाच्या भाषणात सांगितले. संसद भवन ही प्रेरणादायी व तजेलदार वास्तू असते. अशा इमारती वृद्ध व जर्जर होत नाहीत. त्यांना बाद करणे भारतमातेस ‘वृद्ध’ झाल्याचे सांगत वृद्धाश्रमात ढकलण्यासारखे आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.