Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसाद लाड म्हणाले, हे निव्वळ राजकारण, तरीही मी माफी मागतो, सगळ्याचा ठपका राष्ट्रवादीवर…

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणात आणि जन्म शिवनेरीवर झाला असं म्हटलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रसाद लाड म्हणाले, हे निव्वळ राजकारण, तरीही मी माफी मागतो, सगळ्याचा ठपका राष्ट्रवादीवर...
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 6:03 PM

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, आमदार संजय गायकवाड आणि आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्याभरातून शिवप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. भाजपच्या विरोधकांनीही राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा इशारा दिला आहे.

तर प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, मी जे वक्तव्य केले आहे.

त्यानंतर मी म्हटलं आहे की, कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण वादग्रस्त काही बोललो नाही.

त्यातून नको तो अर्थ काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे असा ठपका त्यांनी राष्ट्रवादीवर आणि त्यांच्या नेत्यावर ठेवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रमाणे राजकारण करत आहे त्याचा मी निषेध करतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ज्या भावनेतून आम्ही कार्यक्रम केला आहे, ‘स्वराज्य कोकण भूमी’ त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटले होते की, ती मी चूक सुधारली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणात आणि जन्म शिवनेरीवर झाला असं म्हटलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यासोबत जे संजय यादव बसलेले होते, त्यांनी देखील ऐकले मी काय म्हटले आहे ते त्यांनी ऐकले आहे. तरीही छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.

'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत...
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत....
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?.
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा.