Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटातील खासदार, आमदारांना पुन्हा सोबत घेणार का?, संजय राऊत यांचं मोठं विधान; आता सर्व…

स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. चर्चा करून घेतली. आता गजाभाऊ सांगत आहेत आम्हाला लाथा घालत आहे. सासूरवास करत आहे. तेच सांगत आहेत. म्हणजे भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही.

शिंदे गटातील खासदार, आमदारांना पुन्हा सोबत घेणार का?, संजय राऊत यांचं मोठं विधान; आता सर्व...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 11:08 AM

मुंबई : शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना ठाकरे गटात पुन्हा प्रवेश मिळणार की नाही? याची चर्चा अजूनही जोरात आहे. काहींच्या मते बदलत्या राजकीय परिस्थितीत फुटून गेलेल्या नेत्यांना पुन्हाठाकरे गटात प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण आदित्य ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी तसे सुतोवाच केलं होतं. तर काहींच्या मते उद्धव ठाकरे या फुटीर नेत्यांना कदापि माफ करणार नाहीत. त्यामुळे या खासदार आणि आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. ज्यांनी केवळ पैशासाठी बेईमानी केली त्यांना परत पक्षात प्रवेश देणार नाही. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्यात रोष आहे. त्यामुळे या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही, असं राऊत यांनी निक्षून सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आम्ही काय वेगळं सांगत होतो?

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गजाभाऊ कीर्तिकर आम्ही एकत्र असताना ते आमचे जवळचे सहकारी होते. त्यांनी सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं. त्यांच्या गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे. त्यांना अपमानित केलं जात आहे, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. कीर्तिकर आता बोलत आहेत. मग आम्ही काय वेगळं सांगत होतो? भाजप ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक देत आहे. शिवसेनेला खतम करण्याच्या भूमिकेतून काम करत होती. म्हणून शिवसेना वेगळी झाली, राऊत म्हणाले.

चिडीतून भाजपपासून दूर गेलो

भाजप अजगर आणि मगर आहे. जे सोबत गेले त्यांना खाऊन टाकलं. आता मिंधे गटाला अनुभव येत आहे. हळूहळू कळेल या मगरीपासून दूर जाण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. हा फुटलेला गट आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. झालेल्या गटात दोन गट पडले आहेत. कीर्तिकर यांनी सांगितलं तीच भूमिका आमची पहिल्यापासून होती. त्याच चिडीतून आम्ही भाजपपासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही, असं त्यांनी सांगितलं.

भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही

भाजपने आम्हाला निधी मिळू दिला नाही. त्यावेळी भाजपने शिवसेनेच्या अनेक आमदारांची कामे रखडून ठेवली होती. अनेक शब्द दिले होते. ते पार पाडले नाही. प्रमुख लोकांना अपमानित केलं. सत्तेत समान भागिदारीही दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. चर्चा करून घेतली. आता गजाभाऊ सांगत आहेत आम्हाला लाथा घालत आहे. सासूरवास करत आहे. तेच सांगत आहेत. म्हणजे भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही. कीर्तिकर तिथे गेले तरी सुखात नाही, समाधानी नाहीत याचा अर्थ खुराड्यातील एक एक कोंबडी कापली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.