Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: हिंदू धर्मात फूट पाडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचा मनसेवर आरोप

Sanjay Raut: कायद्याचं राज्य चालतं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार काम होत असतं.

Sanjay Raut: हिंदू धर्मात फूट पाडून दंगली घडवण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचा मनसेवर आरोप
संजय राऊत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार, शिवसेनेच्या भात्यातून पहिला बाण बाहेरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:56 AM

मुंबई: लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसेवर (mns) गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. तणाव निर्माण करण्याचा दंगे घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. प्रश्नच येत नाही. गृहमंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण असावं. देशभरात ते लागू करावं. इथे जात आणि धर्माचा विषय येत नाही. मशिदीवरील (masjid) भोंग्याचा विषय ज्यांनी काढला. त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला. भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडायचा प्रयत्न केला. त्यांना हिंदू धर्मात गट करून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, पण सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही. या राज्यातील जनता सुजाण आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत मीडियाशी बोलत होते. कायद्याचं राज्य चालतं. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार काम होत असतं. महाराष्ट्रात शांतता आहे. संघर्ष नाही. कोणत्याही समुदायात ताणतणाव नाही. सर्व ठिक आहे. काही लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. पण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्याला उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात हे चालणार नाही. देशातही चालणार नाही. पण भोंग्याबाबतचं एक धोरण असावं. आम्ही आधीही सांगितलं आहे. संपूर्ण देशासाठी हे धोरण असावं. केंद्र सरकारला ते करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही

आज स्वयंपाकाचा गॅस महागला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महागाईवर बोलायला कोणीच तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. त्यात ते मध्यस्थी करत आहेत. त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एक तरी नेता किंवा मंत्री बोलतोय का? भोंग्यावर कसले बोलता याच्यावर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, असं राऊत यांनी भाजपला सुनावलं.

तुम्ही महागाईवर तर बोला

देशातील सर्वात मोठी समस्या महागाई आहे. केंद्रीय अर्थमंत्रीही महागाईवर बोलत नाहीत. भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेही महागाईवर बोलत नाहीत. त्यांचे मुद्दे वेगळे आहेत. पंजाबचे पोलीस काय करत आहेत. महाराष्ट्रातील पोलीस काय करत आहेत. रशिया-युक्रेनचा झगडा ते पाहून घेतील. तुम्ही महागाईवर तर बोला, असं ते म्हणाले.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.