त्यांचा पेगही 1500 रुपयांचा, संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut on CM Eknath Shinde Government : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून सरकारला घेरलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

त्यांचा पेगही 1500 रुपयांचा, संजय राऊत यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
संजय राऊत
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 10:48 AM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेवर विरोधक टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.  राज्यातील हे सरकार १५००च्यावर जाणार नाही. स्वत १५ हजार कोटी ठेवतील. पण बहिणींना १५००, कर्मचाऱ्यांना १५०० देतील. त्यांचं १५०० चं लिमिट आहे. त्यांचा एक पेग १५०० चा आहे. त्याच्यावर ते जाणार नाही. आमच्याकडून कुणी कोर्टात गेलं नाही. कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. ते कोर्टालाही १५०० पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. गडचिरोलीचा कायापालट करणार असं सांगत होते. आदिवासी आणि गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यापैक्षा या ठिकाणी खाण उद्योग आहे. त्याचा आर्थिक व्यवहार आपल्याला हातात राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा जवळ ठेवला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नेमले आहेत. आदिवासींचा विकास नाहीये. आदिवासींना मृतदेह खांद्यावर घेऊन जावं लागत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यनमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळला, राऊतांनी सरकारला घेरलं

हे सरकार महाराजांच्या नावाने भ्रष्टाचार करत आहे. महाराजांचा महाराष्ट्र लुटला जात आहे. गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत. काल आम्ही दुष्काळी भागात होतो. परभणी, हिंगोली, संभाजीनगर येथील रस्ते वाहून गेले. तिकडचे जे तरुण कार्यकर्ते आहेत, ज्यांची घरे शाळा गुरंढोरं वाहून गेली. त्यांनी कागदपत्रे आमच्यासमोर ठेवली. या ग्रामीण भागातील रस्त्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिली आहेत. महाराष्ट्रात तरुण नाहीत का. आम्ही काल फिरत होतो. दुष्काळाची अवस्था गंभीर आहे. सर्व वाहून गेलं आहे. सरकारने पंचनामा केला नाही. गुजरातच्या ठेकेदारांनी केलेले रस्ते वाहून गेले आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. मग फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? मी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर खोटे गुन्हे दाखल केले. मग गृहखात्याला दोषी धरणार का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.