Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार, आमदार महायुतीत जाणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँग्रेस आमदारांवर कारवाई केली जाणारय. मात्र, ज्या आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई करण्यात येणारय. त्या आमदारासंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी मोठा दावा केलाय.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्यानं मविआला मोठा धक्का बसला. दरम्यान फुटलेल्या या आमदारांना काँग्रेस 6 वर्षांसाठी निलंबित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. तर दुसरीकडे याच काँग्रेस आमदारांसंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी एक मोठं विधान केलंय..
ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलीय. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या फुटलेल्या आमदारांचा शोध कसा घेण्यात येणारय. काँग्रेसचे फुटलेले आमदार कसे समजणार?
- 1. डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेस फुटलेल्या आमदारांचा शोध
- 2. काँग्रेसने प्रत्येक आमदारांना डमी मतपत्रिका दिली होती
- 3 . डमी मतपत्रिकेवर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असा पसंतीक्रम द्यायचा होता
- 4. काँग्रेसनं मतदान करताना आमदारांचे गट तयार केले
- 5. कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे आमदारांना सांगितलं होतं
- 6. समजा A नावाच्या आमदाराला त्याच्या चौथ्या पसंतीवर मार्क करताना उजव्या कोपऱ्यात करायचं होतं
- 7. तर B आमदाराला तिसरी पसंती दर्शवताना डाव्या कोपऱ्यात मार्क करायचं होतं
- 8. आमदारांच्या डमी मतपत्रिकेतही याची नोंद करुन ठेवण्यात आली होती
- 9. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतेज पाटील, अभिजीत वंजारींची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड
- 10 सूचनेप्रमाणे मतदान झालं की नाही याच्या पाहणीची निवडणूक प्रतिनिधींवर जबाबदारी होती
पाहा व्हिडीओ:-
क्रॉस व्होटिंगवरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीवर गंभीर आरोप केलेयत. 10 कोटी ते 25 कोटी आमदारांना रोख दिल्याचा आरोप संजय राऊतांकडून देण्यात आलाय. तर राऊतांनी केलेल्या आरोपांना प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदारांना 10 ते 25 कोटी आणि जमिनी दिल्यात संजय राऊतांना समन्स पाठवून चौकशीला बोलावलं पाहिजे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. मात्र, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.