Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वापरा आणि फेका हे यांचे वैशिष्ट्य, उद्धव ठाकरे यांची टीका; म्हणाले, जबाबदारी कोण घेणार?

नियोजन अतिशय वाईट पद्धतीने केलं. ज्यांना मतदार करायचं होतं, त्यांचा तुम्ही बळी घेतलात, असंही ते म्हणाले.

वापरा आणि फेका हे यांचे वैशिष्ट्य, उद्धव ठाकरे यांची टीका; म्हणाले, जबाबदारी कोण घेणार?
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 8:55 PM

मुंबई : अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल मतांचे राजकारण करायचे होते का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला. सत्कार कार्यक्रमांसाठी लाखो लोकं येतात. कारण मोठी माणस लोकांपर्यंत जातात. म्हणून लोकं येतात. या साऱ्या माणसांना त्यांना सावरावं लागते. सांभाळावं लागते. येणारे लोकं आपले मतदार व्हावेत, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता का, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. नियोजन अतिशय वाईट पद्धतीने केला. ज्यांना मतदार करायचं होतं, त्यांचा तुम्ही बळी घेतलात, असंही ते म्हणाले. दुसऱ्यांचा भक्तवर्ग घ्यायचा, अशा पद्धतीचं राजकारण सुरू दिसते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

जे व्हायला नको ते झालं

आता किती वाजले. सहा वाजले. आमची मिटिंग सहा वाजता होणार आहे. त्यामुळे उन्हाचा प्रश्न कुठे येतो. हेच आम्हाला सांगायचं आहे. हे कॉमन सेन्स आहे. उन्हाचे दिवस आहेत. ऊन वाढणारचं आहे. दिवसा असे कार्यक्रम करालं तर जे व्हायला नको होत ते होणारच.

हे सुद्धा वाचा

आयोजकांवर गुन्हे दाखल व्हावेत

खारघर उष्माघाताच्या बळी प्रकरणी एक समितीय सदस्याची निवड करण्यात आली. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, याबाबत सदस्य नियुक्त करण्याची काही गरज नाही. सर्व घडामोडी समोर आहेत. कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे

खारघर प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. कुणी अशी मागणी केली असेल, तर त्यात चुकीचं काय आहे. कुणी मागणी करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. राजीनामा दिला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आशा भोसले यांच्याही कार्यक्रम झाला होता. त्यावेळी सर्व व्यवस्थित झालं होतं. महाराष्ट्र भूषणचे कार्यक्रम कित्तेक वेळा झालेत. खारघर येथील महाराष्ट्र भूषण वितरणाचा कार्यक्रम काही पहिल्यांदा झाला नाही.

वापरा आणि फेका ही भाजपची नीती

मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार होता. त्यामुळे कार्यक्रमाचे योग्य पद्धतीने नियोजन केले गेले पाहिजे होते. उष्माघाताचे बळी गेले. याची जबाबदारी सरकार घेत नाही. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. हीच तर भाजपचे वैशिष्ट्ये आहे. भाजप वापर करून फेकून देते. जबाबदारी घेण्याऐवजी ते दुसऱ्यावर ढकलत असतात, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.