Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : राज्यात थंडीनं केलंय मार्केट जाम; आता रात्रीच नाही तर दिवसा पण भरणार हुडहुडी

Cold Waves Weather Maharashatra : राज्यातील राजकारण तापलेलं असताना राज्यात थंडीने मार्केट जाम केलं आहे. उभा आडवा महाराष्ट्र थंडीने गारठलाय. गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडीचा अंमल होताच, आता दिवस पण थंडीचा दरारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अडगळीत पडलेला स्वेटर भाव खावून जाणार आहे.

Weather Update : राज्यात थंडीनं केलंय मार्केट जाम; आता रात्रीच नाही तर दिवसा पण भरणार हुडहुडी
महाराष्ट्र गारठला
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 9:27 AM

राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापलेलं असताना थंडीने मार्केट जाम केलं आहे. अवघा उभा-आडवा महाराष्ट्र थंडीच्या पट्ट्यात आला आहे. थंडीने मार्केट जाम केले आहे. महाराष्ट्र गारठला आहे. गावापासून ते शहरापर्यंत थंड हवेमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा अंमल होताच पण आता दिवसासुद्धा बोचरी, गुलाबी थंडी प्रत्येकाला जाणवणार आहे. आता गेल्या आठ महिन्यांपासून अडगळीत पडलेल्या स्वेटरला आता भाव आला आहे. तर काही जणांनी ऊबदार कपड्यांसाठी बाजारपेठ जवळ केली आहे. यंदा गारठा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

थंडीचा कडाका वाढला

हे सुद्धा वाचा

राज्यात थंडीचा कडाका वाढला. बंगालच्या उपसागरावरील वादळी वाऱ्यांनी थंडीचा खलिता पाठवला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींनी गारठ्याचे प्रमाण वाढवले आहे. बोचरी थंडी जाणवत असल्याने शुष्क, कोरडेपणा वाढत आहे. काहींना अंगाला खाज जाणवत आहे. या सर्व हवामान घडामोडींमुळे अनेकांचा वीकेंड एकतर उबदार कपड्यात अथवा पर्यटन स्थळी जाण्याची शक्यता आहे. या काळात हाडं गोठवणारी थंडी जाणवली तर आश्चर्य वाटू देऊ नका.

निफाड निच्चांकी, थंडीची लाट कायम

राज्यात गुरूवारी निफाडमध्ये सर्वाधिक पार घसरला. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. या परिसरात पारा 6 अंशांपर्यंत घसरला. तर इतर जिल्ह्यातही तापमान कमालीचे घटले. महाबळेश्वर आणि इतर थंडीच्या ठिकाणांपेक्षा राज्यातील काही भागात थंडीचा कडाका जाणवला. राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचे समजते. राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर यलो अलर्ट कायम आहे.

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ

दक्षिणेकडील राज्यात चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. तामिळनाडू, कराईकल, पुद्दुचेरी यासह आंध्र प्रदेशाच्या किनार पट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायलसीमामध्ये सुद्धा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कहर असून दाट धुके असेल. या सर्व घडामोडींमुळे राज्यात थंडीचा जोर कायम असण्याची शक्यता आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.