Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार? पीयूष गोयल यांची मोठी भविष्यवाणी

Uddhav Thackeray-BJP Alliance : राज्यात प्रचाराचा नारळ फुटला आहे. रॅली, सभांना जनतेचा प्रतिसाद असला तरी या निवडणुकीत कुणाची खिचडी शिजणार हे ठामपणे कोणाला ही सांगता येत नाही. निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरणं बदलू शकतात, असे संकेत काही नेते देत आहेत. तर भाजप नेते पीयूष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मनधरणीसाठी 'मातोश्री'वर जाणार? पीयूष गोयल यांची मोठी भविष्यवाणी
उद्धव सेना-भाजप एकत्र येणार?
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 9:18 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराचा धडाका सुरू आहे. यंदा राजकारणाची अभूतपूर्व खिचडी झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशाच खिचडीतून तयार झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे. तर भाजप नेते पीयूष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले पीयूष गोयल?

बिझनेस टुडे यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरु असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. “मी स्पष्ट करतो की, पडद्यामागून कुठलीही चर्चा, संवाद, संपर्क करण्यात आलेला नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत अजून मजबुतीने उभे आहोत. त्या शिवसेना गटासोबत आमचा काही एक संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप यांचा मिळून एक मजबूत युती तयार झाली आहे. आमचे महायुतीचे सरकार राज्यात बहुमताने निवडून येईल आणि हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र करण्याच्या संकल्पात सहभागी आहे, यावर त्यांनी जोर दिला.

लोकसभेत कमी मतांनी पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूकीनंतर लागलीच होत आहेत. लोकसभेत विरोधी आघाडीने महायुतीला झटका दिला होता. त्यावर पीयूष गोयल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीबाबत मी मोठा आशावादी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही काही जागांवर अगदी कमी मतांनी हारलो. काही ठिकाणी महाविकास आघाडीने चांगले प्रदर्शन केले असले तरी विजयी आणि पराभव झालेल्या उमेदवारात मतांचा मोठा फरक नसल्याचे दिसून आले. 11 जागांवर तरी असेच चित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.