Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं

पहिली लाट कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाली, त्यामुळे नागरिक नियम न पाळता बाहेर पडले, हे वाढत्या संसर्ग आणि मृत्यूचे महत्त्वाचे कारण मानले जाते (Nagpur Corona deaths COVID)

Nagpur Corona | दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 2:58 PM

नागपूर : नागपुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं तांडव सुरु आहे. दिल्ली आणि गुजरात राज्यात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले नाहीत, तितके एकट्या नागपुरात होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनासोबतच नागपूरकरांची चिंता वाढली आहे. नागपुरात मृत्यूदर इतका का वाढत आहे, याविषयी खास रिपोर्ट. (Nagpur Corona Update why rapid growth in number of deaths due to COVID in Nagpur)

राज्याची उपराजधानी नागपूर कोरोनाच्या विळख्यात आली आहे. सोबतच इथे मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. दर दिवसाला 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मार्च महिन्याच्या 27 तारखेपासून मृत्यूचा आकडा 50 च्या वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी 60 जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांची हलगर्जी जीवावर

कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावरही सुरुवातीचे काही दिवस औषधोपचार करुन नागरिक घरीच राहत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे, परंतु नागरिक ते करत नसल्याचे चित्र नागपुरात बघायला मिळत आहे. हे सगळं चित्र नागपूरकरांची झोप उडवणारं आहे. सोबतच प्रशासनाच्या व्यवस्थेची पोलखोल सुद्धा करत आहे. आयएमएचे सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांच्या माहितीनुसार नागपुरात वाढत्या मृत्यूसंख्येची कारणं पाहुयात

नागपूरमध्ये कोरोना मृत्यू दर वाढण्यामागील कारणं कोणती?

1. पहिली लाट कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाली, त्यामुळे नागरिक नियम न पाळता बाहेर पडले 2. थोडा ताप किंवा खोकला वाटल्यास गोळ्या घेऊन घरीच राहणे 3. डॉक्टरांचा सल्ला न घेणे 4. कोरोना टेस्ट सांगून सुद्धा न करणे 5. लक्षण वाढल्यानंतर रुग्णालयात जाणे, तोपर्यंत केस डॉक्टरांच्या हाताबाहेर गेलेली असते 6. इतर आजार आणि कोरोना एकत्र आल्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त 7. डॉक्टरकडे उशिरा पोहचणे, त्यातही ऑक्सिजन लागणारे रुग्ण जास्त असल्याने प्रक्रियेस उशीर होणे 8. बेडची संख्या कमी असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढते

नागपुरात वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू

27 मार्च – 3688 रुग्ण , 54 मृत्यू 28 मार्च – 3970 रुग्ण , 58 मृत्यू 29 मार्च – 3177 रुग्ण , 55 मृत्यू 30 मार्च – 1156 रुग्ण , 54 मृत्यू 31 मार्च – 2885 रुग्ण , 58 मृत्यू 1 एप्रिल – 3639 रुग्ण , 60 मृत्यू

नागपुरात आता सरकारी आणि खाजगी रुग्णालयात किती बेड शिल्लक

ऑक्सिजन बेड – 246 आयसीयू बेड – 32 व्हेंटिलेटर बेड – 11

एवढेच बेड शिल्लक असून त्यातही काही बेड राखीव ठेवावे लागतात. त्यामुळे अनेक रुग्णांना बेडच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनामुळे जाणाऱ्या बळींची संख्या वाढत आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना नियमांचं उल्लंघन, एकाच दिवशी 50 हजार रुपयांचा दंड वसूल, नागपूर महापालिकेचा दणका

Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

(Nagpur Corona Update why rapid growth in number of deaths due to COVID in Nagpur)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.