Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“नीरव मोदी, ललित मोदी हे दोघंही ओबीसीचे मोठे नेते”; काँग्रेसच्या नेत्यानं भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने हेच दाखवून दिले आहे की, कायद्याला आम्ही मानत नाही, कायद्याच्या पलिकडे आणि लोकशाही न जुमानता आम्ही देशात काहीही करू शकतो असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

नीरव मोदी, ललित मोदी हे दोघंही ओबीसीचे मोठे नेते; काँग्रेसच्या नेत्यानं भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 10:03 PM

नागपूर : देशातील ओबीसी समाजाचे सगळ्यात मोठे नेते कोण असतील तर ते म्हणजे नीरव मोदी आणि ललित मोदी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केल्यामुळे भाजपमधील ओबीसी नेत्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानाला लुटून गेलेले नीरव मोदी आणि ललित मोदी यांना सन्मानाने भारतात आणण्याची गरज आहे अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द झाल्याने त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने राज्यात ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरही विजय वडेट्टीवार जोरदार हल्लाबोल केला आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने ललित मोदी आणि नीरव मोदी यांना हिंदुस्थानात परत आणलं पाहिजे कारण हे दोघं नेते ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत.

तसेच देशाला लुटून हे दोन्ही नेते ओबीसीचे नेते पळून गेल्यामुळे भारतातील जनता प्रचंड नाराज झाली आहे.तसेच ओबीसी समाजाला यांच्यामुळे फार मोठ तोटा झाला आहे.

ललित मोदी आणि नीरव मोदी यांनी परत भारतात यावे. पुन्हा आम्ही या दोघांना आम्ही चोर मानणार नाही. या दोघांनाही आम्ही आमचे नेते मानू.

ललित आणि नीरव मोदी तुम्ही कितीही वेळाहिंदुस्थानाला लुटून घेऊन गेला तरी आम्ही तुम्हाला माफ करू असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

ललित आणि नीरव मोदी यांनी भारतात लवकर परत यावे, कारण ओबीसी समाज त्यांची आतुरतेने वाट बघत आहे. राहुल गांधी यांनी या दोघांचा अपमान केल्यामुळे भाजपमधील ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे.

त्यामुळे सध्या तुमच्या भाषणाची आणि तुमच्या प्रचाराची आता या देशाला गरज आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ भारतात या असा टोला मोदी यांना लगावत त्यांनी भाजप आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. सध्या भारताला लुटणाऱ्यांवर टीका करायची नाही.

अशा सरकारमुळेच ललित आणि नीरव तुमची स्वागत करण्याची वेळ आली आहे. भाजपला ही दोन माणसं प्रिय असून या दोन्ही माणसांचे फोटो लावून त्यांचे जोरदार स्वागत केले पाहिजे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. या अशा राजकारणामुळे देशात कुठल्या बाजूने राजकारण चालू झालं ते कळेल.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने लोकशाही संपवण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे. त्यामुळे देशातील लोकशाहीचा प्रवास हा हुकूमशाहीकडे चालू झाला आहे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने हेच दाखवून दिले आहे की, कायद्याला आम्ही मानत नाही, कायद्याच्या पलिकडे आणि लोकशाही न जुमानता आम्ही देशात काहीही करू शकतो असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.