Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Nagpur Water Crisis | नागपुरात वीज, पाणी प्रश्न पेटला; भाजप संतप्त, मनपात गेलेल्या माजी नगरसेवकाला धक्काबुक्की

नागपुरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याप्रकरणी भाजप संतप्त झाले आहे. मनपावर प्रशासक आले आणि समस्या वाढली, असा आरोप संतप्त भाजप नेत्यांनी केलाय. आमदार चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

Video Nagpur Water Crisis | नागपुरात वीज, पाणी प्रश्न पेटला; भाजप संतप्त, मनपात गेलेल्या माजी नगरसेवकाला धक्काबुक्की
नागपूर मनपात माजी नगरसेवकाला पोलिसांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 1:42 PM

नागपूर : 24 बाय सात पाणीपुरवठ्याचं शहर असलेल्या नागपूर सध्या पाण्याची भीषण समस्या जाणवतेय. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. वितरण नियोजन नसल्यानं सध्या नागपुरात भीषण पाणी समस्या जाणवतेय. महानगरपालिका बरखास्त झाली. पाच मार्चपासून नागपूर मनपावर प्रशासक (Administrator) नेमला. नागपुरातील पाणीसमस्या वाढली, असा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. पाण्याच्या समस्येबाबत आज भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्तांनी निवेदन दिलंय. कन्हान परिसरात पंपिंग स्टेशन येथे ट्रिपिंगची समस्या आणि पाणी गळतीमुळे नागपुरात पाणीटंचाई आहे. पाणी समस्या (Water scarcity ) सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मनपा आयुक्तांनी सांगितलं.

माजी नगरसेवकाला धक्काबुक्की

नागपूर शहरात समप्रमाणात पाण्याचं वितरण होत नाही. ते योग्य पद्धतीनं व्हावं, या मागणीसाठी माजी नगरेसवक मनोज चाफले हे महापालिकेत आयुक्तांना भेटावयाला गेले. परंतु, महापालिका पभाजप नगरसेवक पाणी प्रश्नासाठी महापालिका आयुक्तांच्या भेटीला गेले होते. शहरातील अनेक भागांत पाणी टंचाई आहे. पाण्याचं अयोग्य वितरण होत आहे, असा माजी नगरसेवकाचा आरोप आहे. नागपूर मनपा मुख्यालयात पोलिसांनी धक्काबुक्की केली. भाजपचे माजी नगरसेवक मनोज चाफले यांनी हा आरोप केलाय. पाणी प्रश्न मांडण्यासाठी आलं असता धक्काबुक्की करण्यात आली. जनतेचे प्रश्न मांडू दिले नाही तर पुढच्या वेळेस तोडफोड करू असा इशाराही चाफले यांनी दिला. नागपूर मनपा मुख्यालयात पाणी प्रश्न पेटला.

पाहा व्हिडीओ

ऊर्जा विभागाचे 18 हजार कोटी थकीत

राज्य सरकारकडे ऊर्जा विभागाचे 18 हजार कोटी थकवून ठेवलेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वादामुळे महाराष्ट्र होरपळतोय. गेल्या दोन वर्षांत ऊर्जा विभागाच्या तिन्ही कंपन्यांचं नियोजन नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरु झालंय. भंडारा, गोंदिया सारख्या परिसरात मोठं भारनियमन केलं जात आहे. सरकारने 18 हजार कोटी दिले तर लोडशेडिंगचं संकट टळेल, असं मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. 12 डिसेंबर 2012 ला लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा तेव्हाच्या सरकारने केली होती. पण ती पूर्ण करणं त्यांना जमलं नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य लोडशेडींगमुक्त केले. आता तीन पक्षांच्या अंतर्गत वादामुळे ऊर्जा मंत्रालयाचा 18 हजार कोटींचा निधी खोळंबला आहे. परिणामी विजेचे मोठे संकट निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र होरपळतो आहे. वाद बाजूला ठेऊन राज्याला विजेच्या संकटापासून थांबविण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Video Buldana Leopard | खल्ल्याळ गव्हाण परिसरात विहिरीत पडला बिबट; वन विभागाच्या टीमने काढले सुखरूप बाहेर

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.