Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : पुरुषांना महिलांबद्दल चिंता करण्याची गरज नाही, त्या सशक्त असल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन

डॉ. मोहन भागवत म्हणाले, महिला या सगळं करू शकतात. महिलांना आपलं कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळते. तेव्हा त्यांना महिला आहे म्हणून थांबवू नका.

Mohan Bhagwat : पुरुषांना महिलांबद्दल चिंता करण्याची गरज नाही, त्या सशक्त असल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन
मोहन भागवत यांचं प्रतिपादन
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 9:02 PM

नागपूर : अखिल भारतीय महिला चरित्र (Women Biography) कोष प्रथम खंड – प्राचीन भारत पुस्तकाचे प्रकाशन नागपुरात करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन (publication) करण्यात आले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, पुरुष श्रेष्ठ की नारी श्रेष्ठ यावर विवाद येतो. दोन्ही पाय सोबत राहणं हे आमचं कल्चर आहे. त्यामुळे महिला आणि पुरुष समान आहे. आमच्या संस्कृतीवर टीका करणारे आज आमच्या कुटुंब संस्कृतीचा अभ्यास करायला लागले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या मातृ शक्तीच स्थान काय आहे. हे बघितलं तर तिला एक तर आपण मातेचं स्थान देतो नाही तर दासीचं. महिलेच्या उन्नतीबद्दल पुरुषांनी चिंता करण्याची गरज नाही. त्या स्वतः सशक्त आहेत. असं प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केलं. प्राचीन महिलांच्या खंडाचं नागपुरात लोकार्पण करण्यात आलं. यावेळी चिटणवीस सेंटर (Chitnavis Centre) येथे ते आज बोलत होते.

मातृशक्तीचं श्रावणात पारायण व्हायला हवं

डॉ. मोहन भागवत म्हणाले, महिला या सगळं करू शकतात. महिलांना आपलं कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळते. तेव्हा त्यांना महिला आहे म्हणून थांबवू नका. या कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त आहे. मात्र पुरुषांची संख्या असायला पाहिजे होती. कारण आपल्या प्राचीन काळातील महिलांच्या कर्तृत्वाचं वर्णन या खंडात आहे. याचं तर श्रावणात पारायण व्हायला पाहिजे. मातृशक्तीचं किती मोठं योगदान आहे, हे बघा, असंही त्यांनी सांगितलं.

संस्कार मूल्य बदलायला नको

डॉ. भागवत म्हणाले, मात्र आताच्या घरात मातृशक्तीला किती महत्वं दिलं जात हे सुद्धा पाहिलं पाहिजे. यासाठी आपण जगायला पाहिजे. वेळेनुसार जगण्याची शैली बदलते. मात्र संस्कार मूल्य बदलायला नको. हे या ग्रंथातून शिकायला मिळते. आपल्या परिवारात या ग्रंथाची चर्चा करा. त्यातून नवीन पिढीत सुद्धा परिवर्तन होईल आणि मातृशक्तीचं महत्व वाढेल, असं वाटते.

हे सुद्धा वाचा

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.