Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur OBC : नागपुरात भाजपकडून ओबीसी उमेदवारांची चाचपणी, 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव

नागपूर महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार कसे निवडून येतील? याची रणनीती भाजपकडून आखली जात आहेत, अशी माहिती भाजपचे अविनाश ठाकरे यांनी दिली.

Nagpur OBC : नागपुरात भाजपकडून ओबीसी उमेदवारांची चाचपणी, 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव
नागपुरात भाजपकडून ओबीसी उमेदवारांची चाचपणी
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 4:34 PM

नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. नागपूर शहरात 30 पेक्षा जास्त जागा ओबीसींसाठी राखीव (OBC Reservation) असणार आहेत. या राखीव जागांवर भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आलीय. नागपूर भाजपनंही ही बाब मान्य केलीय. बदलत्या समीकरणानुसार नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघात (Constituency), ओबीसी उमेदवारांची चाचपणी सुरु केलीय. निवडून येण्याची क्षमता, समाजातील स्थान यानुसार पक्षश्रेष्ठी उमेदवारी देतील, असं मत भाजप नेते अविनाश ठाकरे (Avinash Thackeray) यांनी व्यक्त केलंय. नागपूर महानगरपालिकेत गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, यावेळेसंही सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केलीय. फडणवीस – गडकरींच्या शहरात भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेली नागपूर महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार कसे निवडून येतील? याची रणनीती भाजपकडून आखली जात आहेत, अशी माहिती भाजपचे अविनाश ठाकरे यांनी दिली.

नगरसेवकांची वाढलेली संख्या कमी करावी

दरम्यान, थेट जनतेतून सरपंच आणि नगरसेवक निवडा. महाविकासआघाडी सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करा. स्थानिक स्वराज्य संस्थांची वाढवलेली सदस्य संख्या रद्द करा. प्रभाग रचनेत दुरूस्ती करून नव्याने रचना करावी, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, अशा अनेक मागण्या भाजपचे प्रदेश सरचीटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे – फडणवीस सरकारकडे केल्या. त्या मागण्या मान्यही झाल्या. या सरकारने महाविकास आघाडी सरकारने निर्णय बदलले. आज बावनकुळे यांनी नव्या दोन मागण्या शिंदे – फडणीस सरकारकडे केल्या. त्यात नगरपंचायत आणि नगरपालिकेत वाढलेली नगरसेवकांची संख्या कमी करावी, 2011 च्या जनगणनेनुसार नगरसेवक संख्या असावी आणि वैधानिक विकास महामंडळ पुनरुज्जीवीत करावे, या दोन मागण्या बावनकुळे यांनी आज केल्यात. त्यामुळे भविष्यात हे दोन्ही निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतले तर नवल वाटायला नको.

हे सुद्धा वाचा

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.