Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, यांना…

Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवार आज नागपूरमध्ये आहेत. इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांनी निशाणा साधला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन' वर शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर बातमी...

'वन नेशन, वन इलेक्शन'वरून शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, यांना...
Sharad Pawar Narendra Modi
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 1:51 PM

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारला चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेता येत नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. तसंच देशात सध्या शांततेची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना सबंध देशाच्या निवडणुका एकावेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली. हे असं पंतप्रधान बोलून 12 तास झाले नाहीत. तोवर आपल्याला ऐकायला मिळतंय की जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. पण झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालेली नाही. सबंध देशात एकावेळी निवडूक घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राची निवडणूक जाहीर न होणं हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, असं शरद पवार म्हणाले.

देशात शांततेची गरज- शरद पवार

बांग्लादेशमधील हिंसाचार आणि त्याचे भारत आणि विशेषत: महाराष्ट्रावर होत असलेल्या परिणामांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.  पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशला लागून आहेत. पण तिथं काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळतील, असं कधी घडलं नाही. या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण देशात सामजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज आहे. त्यासाठी समाजातील सगळ्याच घटकांनी खबरदारी घ्यावी एवढंच मी बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई यावर भाष्य करता येईल पण आज शांतता आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणातील अन्य बाबींवर मी भाष्य करू इच्छित नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.