Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, ‘पैठणी’चा उद्योग संकटात; दर कमी करण्याची मागणी

कच्चा माल महाग झाल्याने पैठणी साड्यांचा उद्योग संकटात सापडला आहे. कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, 'पैठणी'चा उद्योग संकटात; दर कमी करण्याची मागणी
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 3:00 PM

पैठणी (Paithani) साडीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने विणकर संकटात सापडले आहेत. पैठणीसाठी लागणारा कच्चामाल (Raw material) हा बंगळुरुहून (Bangalore) येवल्यात येतो. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने मालाच्या दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. पैठणी साडीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत पैठणी साडीचे दर वाढले नसल्याने व्यवसायिक संकटात सापडले आहेत. जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे. कच्च्या मालाचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले असून, व्यवसाय परवडत नाही. व्यवसायातून मिळणाऱ्या मार्जीनमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सरकारने कच्च्या मालाचे भाव कमी करावेत, आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी व्यवसायिकांनी सरकारकडे केली आहे.

तुतीच्या पिकाला पावसाचा फटका

दरम्यान एकीकडे पैठणीसाठी लागणारा कच्चा माल तर महाग झालाच आहे. मात्र दुसरीकडे तुतीचे पीक देखील पावसामुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे रेशीम उद्योग देखील संकटात सापडला आहे. यंदा तुतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. अवकाळी पावसामुळे तुतीच्या पिकात घट झाली. परिणामी रेशीमचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकले नाही. पैठणीसाठी लागणार कच्चा माल महाग झाला आहे. सोबतच रेशीमचे उत्पादन कमी असल्यामुळे त्याच्या देखील भावात वाढ झाल्याने विणकर दुहेरी संकटात सापडले आहेत. काही महिन्यापूर्वी पाच हजार रुपये भाव असलेल्या रेशीमचा दर आता साते ते साडेसात हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता कच्च्या मालाचे दर कमी करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे.

येवल्याच्या पैठणीला देशभरात मागणी

येवला शहर हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे, येवल्यात तयार होणाऱ्या पैठणीला देशभरात मोठी मागणी असते. पैठणीच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते. अनेकांना रोजगार मिळतो. मात्र सध्या पैठणीसाठी लागणारा कच्चा माल महागल्याने मार्जीनमध्ये घट झाली आहे. कच्चा माला महाग झाला मात्र दुसरीकडे पैठणीच्या दरात वाढ न झाल्याने उद्योजक संकटात सापडले आहेत.

हे सुद्धा वाचा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.