Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले
नवी मुंबई महापालिका
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 10:52 AM

नवी मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी शनिवारी याबाबतचे निर्देश दिले आहे. तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Navi Mumbai Corona Patient Increase restrictions were extended till 19 July)

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बंधाचे व्यवसायिक आणि नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे अवाहन महानगरपालिकेने केले आहे.

बेलापूर कोरोनाचा हॉटस्पॉट

नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसरात रुग्ण नियंत्रणात असले तरी सिडको विकसित नोडमध्ये नवीन रुग्णांची वाढ होत आहे. सीबीडी बेलापूर परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. नेरुळ, कोपरखैरणे, वाशी परिसरातही प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने शहरातील पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या प्रमाणावर आधारित विविध आर्थिक आणि सामाजिक अॅक्टीव्हिटीज विचारात घेऊन 5 स्तर जाहीर केले आहेत.

निर्बंध 19 जुलैपर्यंत वाढविले

नवी मुंबई महानगरपालिकेचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश होत आहे. यामुळे मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी आदेश काढून निर्बंध 19 जुलैपर्यंत वाढविले आहेत. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेले नियम यापुढेही लागू होणार आहे. निर्धारीत वेळेतच व्यवसायिकांनी दुकाने सुरु ठेवावी. नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नवी मुंबईमध्ये 100 रुग्ण वाढले

नवी मुंबई शहरात शनिवारी 200 रुग्ण वाढले असून 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत कोरोना मृतांचा आकडा 1782 झाला आहे. तर शहरातील 466 रुग्ण घरामध्येच उपचार घेत आहेत. उपचार सुरु असलेल्यांपैकी 101 जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

(Navi Mumbai Corona Patient Increase restrictions were extended till 19 July)

संबंधित बातम्या : 

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

अनलॉकनंतर मोठ्या प्रमाणात घरफोड्या, नवी मुंबईत सराईत चोरांची टोळी गजाआड

पंतप्रधान आवास बांधकामामुळे एपीएमसी मार्केट परिसरात मोठी वाहतूक कोंडी, मुंबई APMC पाठोपाठ व्यापाऱ्यांची कोर्टात धाव

'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.