Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुनी पेन्शन तर नाहीच, पण आता पगारही कापणार, कुणी घेतला ‘हा’ तुघलकी निर्णय ?

शासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च असा संप केला होता. या संपामध्ये ब, क आणि ड वर्गातील सुमारे 14 लाख कर्मचारी सहभागी झाले होते.

जुनी पेन्शन तर नाहीच, पण आता पगारही कापणार, कुणी घेतला 'हा' तुघलकी निर्णय ?
OLD PENSHION SCHEMEImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 8:41 PM

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना आणि सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे. यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली समितीचा अहवाल आल्यानंतर निणर्य घेऊ असे आश्वासन देत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.

शासकीय कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च असा संप केला होता. या संपामध्ये ब, क आणि ड वर्गातील सुमारे 14 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर संघटनांनी हा संप मागे घेतला. यावेळी प्रशासनाने संप काळातील गैरहजेरी रजेत परावर्तीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. 14 मार्च ते 20 मार्च असा मार्च महिन्यात 7 दिवसाचा संप कालावधी आता असाधारण रजेत पकडला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

या शासन निर्णयामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांची संप काळातील गैरहजेरी ही आता असाधारण रजेत पकडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत होण्यापासून वाचली आहे. मात्र, या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे.

संपकाळात जितके दिवस कर्मचारी गैरहजर राहिले आहेत, तितक्या दिवसांची कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे. पण, त्यांची सेवा खंडीत होणार नाही. त्यामुळे सेवा पुस्तकात कुठलाही लाल शेरा येणार नाही. त्यामुळे पगार कापला जाणार असला तरी सेवा खंडित होणार नाही याची काळजी घेत प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.