Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा

राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) थकवली आहे, एफआरपीचे तुकडे केले आहेत. ते साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 9:01 PM

कोल्हापूर : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) थकवली आहे, एफआरपीचे तुकडे केले आहेत. ते साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (on FRP issue Raju Shetty slams sugar factory owner said will not allow to open sugar factory)

“स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात 19 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानीने वेगवेगळे ठराव संमत केले. ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले “ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला उशीर केला. तसेच एफआरपी टप्प्याटप्प्यात दिली किंवा थकवली, त्यांच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ज्यांनी एफआरपी द्यायला 14 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला, त्यांच्याकडून 15 टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही साखर आयुक्तांना करणार आहोत.” तसेच ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी थकवली ते साखर कारखाने आम्ही बंद पाडणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कृषी कायद्यांविरोधात 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन

दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना राजू शेट्टी यांना विरोध दर्शविला आहे. त्यांनी येत्या 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार असून महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील असे सांगितले. तसेच राज्याचे शेतकरी देशातील शेतकऱ्यांसोबत असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात येईल असे ते म्हणाले.  हे चक्काजाम आंदेलन 2 तासांचे असून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार उतरुन कृषी कायद्यांना विरोध दर्शवणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात झाला होता.

संबंधित बातम्या :

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

(on FRP issue Raju Shetty slams sugar factory owner said will not allow to open sugar factory)

ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.