Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandardara | भंडारदरा धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला!

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विज निर्मीतीसाठी 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा एकूण 2339 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले.

Bhandardara | भंडारदरा धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 11:02 AM

भंडारदरा : भंडारदरा (Bhandardara) पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत आहे. 3500 क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. हे पाणी प्रवरा नदीत (Pravara River) सोडण्यात आले आहे. यामुळे अत्यंत मनमोहक असा नजारा पहायला मिळतोयं. धरणातील पाणीसाठा 85 टक्के झाला असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग अजून वाढविण्याची होण्याची शक्यता देखील आहे. भंडारदरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy rain) हजेरी लावलीयं.

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विज निर्मीतीसाठी 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा एकूण 2339 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले. हे पाणी खाली निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवडे 80 टक्के भरले आहे. एकंदरीतच काय तर चांगल्या पावसामुळे यंदा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसते आहे.

हे सुद्धा वाचा

भंडारदरा धरण 85.84 टक्के भरले

जिल्हात आतापर्यंत भंडारदरा 62, 2176 मिमी, घाटघर 86, 3002 मिमी, रतनवाडी 82, 3113 मिमी, पांजरे – N.R 655 मिमी, वाकी 49, 1703 मिमी, निळवंडे 06, 801 मिमी, आधला 216 मिमी, अकोले 03, 394 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीयं. तर अहमदनगर जिल्हयातील तीन महत्वाच्या धरणातील सध्याची पाणीपातळी भंडारदरा 85.84 टक्के, निळवंडे 81.67 टक्के, मुळा धरण 65 टक्के आहेत. म्हणजेच काय तर अहमदनगर जिल्हयातील महत्वाची तीनही धरणे चांगल्या स्थितीमध्ये असल्याने अहमदनगरकरांना नो टेन्शन आहे.

त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.