Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Miraj Kolhapur Passenger:मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु! प्रवाशांना मोठा दिलासा

मिरजेमधून दररोज नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दैनंदिन कोल्हापूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती.

Miraj Kolhapur Passenger:मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु! प्रवाशांना मोठा दिलासा
अखेर पॅसेंजर प्रवाशांना मोठा दिलासाImage Credit source: Indian Rail Info
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:17 PM

सांगली : कोरोनामुळे (Corona Pandemic) गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे (Miraj-Kolhapur Passenger Railway) पुन्हा सुरु करण्यात आली. यामुळे सांगलीसह कोल्हापुरातील (Passenger in Sangli And Kolhapur) प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालाय. कोरोनामुळे ही पॅसेंजर रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. अखेर आता पुन्हा ही पॅसेंजर गाडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारपासून (15 एप्रिलपासून) ही पॅसेंजर रेल्वेसेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. कोरोना काळात या गाडीची सेवा थांबवण्यात आल्यानंतर या भागातील लोकांसमोर प्रवासा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, आता हळूहळू राज्यातील निर्बंध पुन्हा उठवण्यात आल्यानंतर पॅसेंजर सेवा कधी सुरु होते, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा फटकाही ग्रामीण भागातील जनतेला बसत होता. अशातच आता मिरज-कोल्हापूर-मिरज रेल्वेसेवा सुरु झाल्यानं अनेक प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पॅसेंजर बंद असल्यानं गैरसोय

दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही ही पॅसेंजर रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसंच गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील एसटी बससेवाही कोलमडली होती. अशावेळी प्रवास करण्याचा हक्काचा पर्याय असलेली पॅसेंजरही बंद असल्यानं लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं.

अखेर मागणी पूर्ण!

मिरजेमधून दररोज नोकरी किंवा व्यवसायानिमित्त दैनंदिन कोल्हापूरला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पॅसेंजर बंद असल्याने सामान्य प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेल्वे सेवाही पूर्ववत झाल्या आहेत. त्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर – मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वेही अखेर सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, आता कोल्हापूर-मिरज पँसेंजर सेवा सुरु केल्यानंतर आता मिरज-पंढरपूर मार्गावरही पॅसेंजर सुरु करण्याची मागणी जोर धरतेय.रज-कोल्हापूर पॅसेंजरचं वेळापत्रक

  1. मिरज-कोल्हापूर पॅसेंजर दररोज दुपारी 2.14 वाजता सुटेल.
  2. दुपारी 3.30 मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल.
  3. कोल्हापूर-मिरज पॅसेंजर दररोज सकाळी 10.30 वाजता कोल्हारातून सुटेल.
  4. दुपारी 11.45 वाजता मिरज स्थानकात पोहोचेल.

इतर बातम्या

भजे घेण्यासाठी रेल्वेतून उतरला खाली अन् ट्रेन सुरु झाली! पुढे जे घडलं ते चांगलंच अंगलट आलं…

रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.