Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही; शरद पवार सर्व्हेवर आणखी काय म्हणाले?

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून जोरदार राजकारण सुरू आहे. या चर्चेचाही पवार यांनी निकाल लावला. पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली. कशाला काढायचा तो प्रश्न.

बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही; शरद पवार सर्व्हेवर आणखी काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 9:14 AM

कोल्हापूर: जनमत चाचणीचे आकडे आले आहेत. या आकडेवारीनुसार आता लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसणार असल्याचं दिसून आलं आहे. तसेच देशपातळीवरही भाजपच्या जागा घटताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या तंबूत खळबळ उडालेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या सर्व्हेवर भाष्य करून भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही, असं चित्रं या सर्व्हेतून दिसतंय, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

तो सर्वे मी वाचला. आज जे सत्ताधारी आहेत, त्यांच्याविरोधात देशात जनमत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता सत्ताधारी पक्षाच्या हातात सत्ता राहील असं वाटत नाही. यापूर्वीचे सर्व्हे पाहिले. पाच ते दहा वर्षापूर्वीचे याच एजन्सीने केलेले सर्व्हेही पाहिले तर या एजन्सीचे आकडे खरे ठरले आहेत. या एजन्सीने एकप्रकारे ही दिशा दाखवली आहे. ही दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीचे आहे असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात परिवर्तन होणार

या सर्व्हेतून देशात काँग्रेसचे आकडे वाढतील असं स्पष्ट दिसत आहे. कर्नाटकात भाजपचं राज्य राहणार नाही. तिथे परिवर्तन करण्यास लोक उत्सुक आहेत. असं चित्रं सर्वत्र दिसतंय. पण उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे. त्याची आकडेवारी आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

विरोधकांना एकत्र आणणार

विरोधकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्वच पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील काही अडचणी आहेत. केरळमध्ये आम्ही डाव्यांसोबत आहोत. पण काँग्रेस आमचा विरोधक आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेससोबत आहोत. असे काही प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढायचा आहे. दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. त्यावेळी आम्ही चर्चा करून मार्ग काढू, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्राकडून ममता बॅनर्जी यांना त्रास

ममता बॅनर्जी या विरोधी आघाडी राहणार काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, केंद्र सरकार या ना त्या एजन्सीचा वापर करून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास देत आहे, असं ते म्हणाले.

कशाला काढायाचा तो प्रश्न

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून जोरदार राजकारण सुरू आहे. या चर्चेचाही पवार यांनी निकाल लावला. पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली. कशाला काढायचा तो प्रश्न, असं म्हणत शरद पवार यांनी हा प्रश्न उडवून लावला.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.