Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांनी एक वीटही रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

रिफायनरी प्रोजेक्त आम्ही आता राज्यातचं आणणार आहोत. या प्रोजेक्टमुळं महाराष्ट्राची पुढची २० वर्षांची वाटचाल आमची अर्थव्यवस्था सुदृढ होणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ज्यांनी एक वीटही रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 9:02 PM

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारनं अडीच वर्षात कोकणासाठी काही केलं नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. आंगणेवाडी येथील सभेत फडणवीस बोलत होते. काही लोकांना दोनवेळा उद्धाटन करण्याचा शौक असल्याची टीकाही त्यावेळी त्यांनी केली. तसेच त्यांनी चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला. चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणे यांचंच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. वादळावेळी ठाकरे सरकारने कोकणाला मदत केली नाही. महाविकास आघाडीचे कोकणावरील प्रेम बेगडी होतं, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

ज्यांनी एक वीटही रचली नाही त्यांनी उद्घाटन केलं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हा टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारनं चांदा ते बांधाच्या योजनेला आपण मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते, मुलभूत सोयी याकरिता निधी दिला. काजू, नारळ, सुपारी, यासंदर्भातील विविध योजना त्या काळात आणल्या. पण, यासारखी एकही चांगली योजना उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आणता आली नाही.

सर्वात मोठी गुंतवणूक होणार होती

कोकणाचं काय नुकसान केलं हे लक्षात घेतलं तर रिफायनरीचा प्रोजेक्स हा आतापर्यंत तयार झाला असता. ही ग्रीन रिफायनरी होती. देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक कधीही झाली नाही, एवढी मोठी गुंतवणूक होणार होती.

एक लाख रोजगार मिळणार होता

तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. तीन सरकारी कंपन्या ही गुंतवणूक करणार होते. एक लाख लोकांना त्याठिकाणी रोजगार मिळणार होता. खोटं सांगून लोकांना फसविलं. रिफायनरी झाली तर आंबे येणार नाहीत, असं खोटं सांगितल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

जामनगर येथील रिफायनरीच्या परिसरातून आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मासेमारी समाजाला सांगितलं तुमचे मासे होणार नाही. खोट बोलून याठिकाणी एका चांगल्या प्रोजेक्टला विरोध केला. आपलं सरकार आलं नसतं तर केंद्र सरकारनं हा प्रोजेक्ट तीन राज्यात नेण्याचा निर्णय घेतला होता.

२० वर्षांची वाटचाल सुदृढ होणार

केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यात हा प्रकल्प गेला असता.रिफायनरी प्रोजेक्त आम्ही आता राज्यातचं आणणार आहोत. या प्रोजेक्टमुळं महाराष्ट्राची पुढची २० वर्षांची वाटचाल आमची अर्थव्यवस्था सुदृढ होणार असल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.