Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही…

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

पाहुणा म्हणून गावात आला, मावस भावासोबत वैरण काढायला नदीत उतरला, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही...
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 7:48 PM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी,  सांगली : रविराज हा सातव्या वर्गात शिकतो. तर अमोल हा दहाव्या वर्गात शिकत होता. आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेल म्हणून तो वाट पाहत होता. उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दोघेही नदी परिसरात गेले. पण, दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावातील परिसरात आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

काल दुपारी २ च्या सुमारास अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्षे, रा.तांदुळवाडी) आणि सुट्टीनिमित्त आलेला आपला मावस भाऊ रविराज उत्तम सुतार (वय वर्षे १२, रा. कराड तालुक्यातील राजमाची) याला घेऊन वैरण काढायला नदीत गेले. ते वारणा नदीकाठावर गेले.

दोघांचाही बुडून मृत्यू

वैरणीचे चार मोदळे काढून झाल्यावर नदीपात्रात उतरले. दोघांनाही पोहायला येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने दोघांचेही प्रेत पाण्यातून बाहेर काढलेत.

हे सुद्धा वाचा

रविराज आला होता मावशीकडे

रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातव्या वर्गात शिकत होता. त्याचे आई वडील हे रोजंदारी करतात. आज रविराजचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजमाची आणि रविराज याच्या घरी शोककळा पसरली आहे.

अमोलने दिली होती दहावीची परीक्षा

अमोल प्रकाश सुतार हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. तरुण मुलगा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळले आहे. सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.