Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी श्रीनिवास वनगा अन् आता कुटुंबही गायब, पालघरमध्ये नेमकं काय घडतंय?

पालघरचे शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा 36 तास बेपत्ता असल्यानंतर घरी परतले, पण नंतर त्यांचे कुटुंबही गायब झाले. आमदारकीचे तिकीट नाकारल्याने ते निराश झाले आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आधी श्रीनिवास वनगा अन् आता कुटुंबही गायब, पालघरमध्ये नेमकं काय घडतंय?
श्रीनिवास वनगा
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 2:07 PM

Srinivas Vanaga Family Missing : गेल्या 36 तासांपासून बेपत्ता असलेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा शोध लागला आहे. महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी आले. त्यांनी त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि ते पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे विश्रांतीसाठी गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निर्धास्त झाले होते. मात्र आता श्रीनिवास वनगा यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबही गायब झाले आहे.

पालघरचे नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा हे 36 तासांनी आपल्या घरी परतले. यानंतर ते पुन्हा एकदा मित्रांसोबत बाहेर गेले. यामुळे कुटुंबीयांची चिंता मिटली होती. त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी श्रीनिवास वनगा विश्रांतीसाठी नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले होते. विश्रांतीनंतर ते काही दिवसांनी घरी परततील. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती.

श्रीनिवास वनगा यांचे घर बंद

श्रीनिवास वनगा हे मित्रासोबत बाहेर गेल्यानंतर आता त्यांचे कुटुंबियही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनिवास वनगा यांच्या घरी कोणीही नसून त्यांच्या घराला कुलूप आहे. श्रीनिवास वनगा यांचे घर बंद आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचे कुटुंबिय घरी नसल्याने हे सर्वजण नेमके कुठे गेले, असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

हे सुद्धा वाचा

वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नाही – श्रीनिवास वनगा

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर गेल्या 36 तासांपासून ते अज्ञातवासात गेले होते. यानंतर आता वनगांचा कुटुंबयाशी संपर्क झाल. मध्यरात्री तीन वाजता श्रीनिवास वनगा हे घरी येऊन पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा हे तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज असल्याने वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा यांची वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नसल्याचे पत्नीने स्पष्ट केले आहे.

पुढची राजकीय भूमिका काय?

श्रीनिवास वनगा हे आपल्या पुनर्वसनाच्या चिंतेत आहेत. त्यामुळे ते 36 तासांपासून अज्ञातवासात गेले आहेत. विश्वास ठेवलेला एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यतीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे, असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी केल्याची माहिती समोर आली आहे .त्यामुळे नॉट रिचेबल असलेले वनगा आता कुटुंबियांच्या संपर्कात आल्याचा पाहायला मिळतंय. यामुळे कुटुंबियांचं पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे. मात्र घरी परतलेले वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेलं नाही. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता पुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.