Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण; आग्रा येथे होणार शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण; आग्रा येथे होणार शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक
Follow us
| Updated on: Mar 21, 2025 | 5:16 PM

मोठी बातमी समोर येत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे असताना ज्या ठिकाणी नजरकैद होते, ती जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार आहे. आग्रा येथे शिवरायांची गाथा सांगणारं संग्रहालय देखील महाराष्ट्र सरकारकडून उभारलं जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून आर्थिक तरदूत करण्यात येणार आहे.

  काय आहे शासन निर्णय?

मराठा साम्राज्याने सतराव्या आणि आठराव्या शतकात भारताच्या विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण केले. हे राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना अनेक कष्टप्रद आव्हाने स्वीकारावी लागली. प्रसंगी काही ठिकाणी माघार सुद्धा घेऊन तह करण्यात आले. यापैकीच मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबतचा सन 1665 मध्ये केलेला ‘पुरंदर तह’ असाच ऐतिहासिदृष्या महत्त्वाचा मानला गेला. या करारानुसार महाराजांनी अनेक किल्ले मुघलांना परत केले. तसेच या तहानुसार महाराज बाळराजे शंभुराजे आणि काही निवडक मावळ्यांसह मुघर दरबारात उपस्थित राहिले. यावेळी महाराजांचा मुघल दरबाराकडून अवमान झाल्यामुळे महाराज दरबार सोडून गेले. मात्र त्यानंतर मुघलांनी महाराजांना नजर कैदेत ठेवले. महाराज जिथे नजरकैदेत होते, त्या ठिकाणी दरवर्षी अनेक जण भेट देत असतात. मात्र तिथे महाराजांचं स्मारक असावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे असताना ज्या ठिकाणी कैद होते, ती जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार आहे. आग्रा येथे शिवरायांची गाथा सांगणारं भव्य असं  संग्रहालय देखील महाराष्ट्र सरकारकडून उभारलं जाणार आहे. या साठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अग्रा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना महाराजांचा इतिहास जाणून घेता येणार आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.