Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांना संपविण्याचं काम, आपल्या लोकांना सुरक्षा, भास्कर जाधव यांची घणाघाती टीका

पण आठवड्यातून एकदा कोर्टने हजेरी लावण्यात यावी, असं कोर्टाने सांगितले.

विरोधकांना संपविण्याचं काम, आपल्या लोकांना सुरक्षा, भास्कर जाधव यांची घणाघाती टीका
भास्कर जाधव यांची घणाघाती टीका Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 4:11 PM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने दडपशाही कारभार सुरू केला आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाला यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षात पाहावी लागते. पण सरकार विरोधी पक्षांचं आवाज बंद करत आहे. अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत. सुरक्षा काढल्या जातात. इकडे पाय काढण्याची भाषा केली तर काही नाही. पण आम्ही भाषण केले म्हणून गुन्हे दाखल केले जातात. दोन समाजात तेढ निर्माण करेल असं भाषण केले, म्हणून गुन्हा दाखलं करण्यात आले.

पण आठवड्यातून एकदा कोर्टने हजेरी लावण्यात यावी, असं कोर्टाने सांगितले. मी कोर्टाचा मान राखत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी आलेलो आहे. अनेक प्रकल्प गेले. फक्त आश्वासन दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांना मोठे प्रकल्प देऊ असं आश्वासन दिलं जात आहे. केंद्रातील शहा यांच मन एवढं मोठं नाही की, गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देतील, असा आरोपही त्यांनी केला.

मोठे प्रकल्प आल्याने महाराष्ट्राचा फायदा होणार होता. मात्र आता लहान मुलाला गोळे खा अन् शांत राहा असं सांगितले जात आहे. तसे चालले आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.

50 खोके सर्वांपर्यंत पोहचले आहेत. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करणार नाही असं मंत्री म्हणतात. गरिबांना वेळेवर दिवाळीची भेट दिली जात नाही, हे मात्र दुर्दैव आहे.विरोधी पक्ष संपवण्याचं काम सुरू असताना आपल्या लोकांना सुरक्षा देत आहेत. सरकारनं समान वागणूक दिली पहिजे. महाराष्ट्र सरकारने सुरक्षा काढली, तर केंद्र सुरक्षा देत आहेत.

मी चाळीस वर्षे राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा व्यवस्था मागितली नाही. मात्र मला गेले तीन वर्षे वाटले सुरक्षा हवी, म्हणून मागितली. बच्चू कडू आणि रवी राणा यांची नुरा कुस्ती आहे. लोकांनी बाकी सगळं विसरावे. म्हणून लक्ष वळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.

महाविकासआघाडी सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली. महाराष्ट्र जागरूक आहे, असा एकेरी उल्लेख करून काही होतं नसतं, असंही ते म्हणाले.

भास्कर जाधव म्हणाले, माझ्याविरोधात नियमबाह्य गुन्हा दाखल केला. पोलीस कोणाच्यातरी प्रेमाखातर काम करत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली नाही. राज्यात वेगवेगळ्या नेत्यांची नक्कल केली जाते. ही सत्ता हुकूमशाहीची आहे. त्यातून हे गुन्हे दाखल होत आहेत. महाप्रबोधन यात्रा अधिक जोमाने होणार असल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.