Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींशी चर्चा करायला मी तयार…; शरद पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण

NCP Leader Sharad Pawar on Narendra Modi : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेस तयार असल्याचं म्हटलं आहे. पवार काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींशी चर्चा करायला मी तयार...; शरद पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण
शरद पवार आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 7:16 PM

लोकसभा निवडणूक नुकतीच संपली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. महाराष्ट्रात तर नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येत शरद पवारांवर वैयक्तिक टीका केला. या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मोदी विरूद्ध पवार असा थेट सामना पाहायला मिळाला. मात्र लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या शिवाय लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही शरद पवारांनी भाष्य केलं. बारामतीत स्थानिकांशी संवाद साधताना शरद पवारांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

मोदींसोबत चर्चेला तयार- पवार

निवडणुकीत टीका टिप्पणी होत असते. माझ्यावर वैयक्तिक टीका केली गेली. नरेंद्र मोदीदेखील माझ्यावर बोलले. पण जे झालं ते झालं… आता विकासासाठी या सगळ्या मंडळींशी चर्चा करायला मी तयार आहे. मात्र यात राजकरण आणणार नाही हा शब्द आहे, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या विधानाची चर्चा होतेय.

साखरेच्या मुद्द्यावर पवारांचं भाष्य

राज्यकार्त्यांनी शहाणपणा दाखवला पाहिजे. केंद्र सरकारने साखरेची निर्यात थांबवली आहे. राज्यात आज साखरेचा प्रचंड साठा आहे. मी सरकारशी चर्चा केली आणि सांगितलं की अशी निर्बंध आणू नका. तर मला त्यांनी संगितलं की लोकसभा निवडणुक होईपर्यंत आम्ही तुमच ऐकणार नाहीय आता दिल्लीत गेल्यावर हा विषय मी मांडणार आहे बघू ऐकतात का… यांनी इथेनॉल ला देखील बंदी घातली आहे हे चुकीचं आहे, असंही शरद पवार म्हणाले.

संजय गेली दहा वर्ष टोकाची भूमिका घेत होते. आता जनतेने संदेश दिला की तुमचे पाय खाली ठेवा. नरेंद्र मोदींनी सरकार बनवलं. पण त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली. सरकार स्थिर राहील अशी अपेक्षा आहे, असंही शरद पवार म्हणाले.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.