Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यात अडकले, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : बाबा आढाव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय.

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यात अडकले, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : बाबा आढाव
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 3:14 PM

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय. तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिलाय. ते पुण्यात बोलत होते.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव म्हणाले, “राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची याच्यात अडकले आहेत. मात्र, त्यांना रिंगरोडला विरोध होत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांची औलाद आहे, एक इंचही जमीन देणार नाही. या आंदोलनाची दखल घेतली नाहीतर, मंत्रालयावर मोर्चा काढू. मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही.”

“नितीन गडकरींनी गावागावात फिरावं, शेतकरी एकही दगड मारणार नाही”

“नितीन गडकरींनी रस्त्यांसाठी भूसंपादन केल्यावर पुनर्वसनासाठी योजना आणायला हवी. त्यांनी गावागावात फिरावं. मी त्यांना घेऊन फिरेल. यावेळी एकही शेतकरी दगड मारणार नाही याची जबाबदारी मी घेतो,” अशी भूमिका बाबा आढावा यांनी पुण्यात मांडलीय.

“पुणे शहरालगत 6 तालुक्यातून रिंग रोड प्रस्तावित, बाधिक शेतकऱ्यांचा विरोध”

पुणे शहरालगत 6 तालुक्यातून रिंग रोड प्रस्तावित आहे. त्याला विरोध करण्यासाठी पुण्यातील विधानभवन येथे बाधित शेतकरी एकवटले होते. 6 तालुक्यातील 84 गावातील एकूण 1872 हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. उर्वरीत 115 हेक्टर जंगल जमीन आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

मनुवादी व्यवस्था आणि संविधान एकाच वेळी वाटचाल करू शकणार नाही : डॉ. बाबा आढाव

वर्षातील 12 महिने चिखलातून प्रवास, शहापूरमधील ‘या’ गावात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ताच नाही

पुण्यातील 23 नव्या गावांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचा पुढाकार; 5 कोटींचा निधी मंजूर

Social Activist Baba Adhav criticize politician over negligence for farmer in Pune

बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...