Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला

केवळ दुकाने सुरु होऊन दारुचा महसूल मिळत नसतो, अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली (Saamana Editorial Criticizes Raj thackeray) आहे.

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला
अयोध्येत एवढा मोठा लढा झालाय. त्यामुळे प्रत्येकानेच तिथे गेले पाहिजे. किंबहुना महाराष्ट्रातील सर्वचे नेत्यांनी अयोध्येत जायला पाहिजे.
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 10:05 AM

मुंबई : महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Saamana Editorial Criticizes Raj thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केली होती. या मागणीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत संगीत मागणी केली, त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असा प्रश्नही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रावरुन पहिल्यांदाच सामनाच्या (Saamana Editorial Criticizes Raj thackeray) संपादकीयमध्ये राज ठाकरे यांच्या फोटोसह लेख छापण्यात आला आहे. “राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करुन मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर,” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“लॉकडाऊनमुळे फक्त वाईन शॉप बंद आहे असे नाही, तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे हे कारखाने सुरु करावे लागतील. हा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरु होऊन दारुचा महसूल मिळत नसतो,” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचा : महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“जर दारुचे कारखाने सुरु करायचे म्हणजे कामगारांची गर्दी आणि वाईन शॉप सुरु करायचे म्हणजे अक्षरश: रेटारेटी आणि हाणामारी. लोक भाजी, अन्न धान्य वैगरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत. पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल, त्याची कल्पनाच करवत नाही. अनेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारु खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखी असेल.” असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

“गेल्या 35 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात चोऱ्या-माऱ्या दरोडे असे गुन्हे घडले नाही. पण मुंबई ठाणे आणि अन्यत्र जे काही दरोडे पडले ते वाईन शॉपवरच. जी लुटमार झाली ती वाईन शॉपचीच,” असेही सामनाच्या अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले (Saamana Editorial Criticizes Raj thackeray)आहे.

संबंधित बातम्या : 

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.