Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ही ऑफर की ट्रॅप? काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि आज संजय राऊत, बंडखोर आमदारांना मुंबईत आणलं की गेम पलटणार?

काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत गुवाहाटीत बंड पुकारलेल्या आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा हेच आवाहन करताना, सरकारच्या पाठिंब्याबाबतही मोठं विधान केलं.

Sanjay Raut : ही ऑफर की ट्रॅप? काल उद्धव ठाकरे म्हणाले आणि आज संजय राऊत, बंडखोर आमदारांना मुंबईत आणलं की गेम पलटणार?
संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 3:42 PM

मुंबई : मुंबईतून संजय राऊत यांनी गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेना (Shiv Sena) आमदारांना अल्टिमेटम दिला. शिवाय त्यांची गोची करणारं वक्तव्यही केलं. सरकारमधून (MVA) बाहेर पडण्यास शिवसेना तयार आहे, असं वक्तव्य मी जबाबदारीने करतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलंय. पण त्यासाठी त्यांनी एक अटक घातली आहे. 24 तासांत तुम्हाला मुंबईत यावं लागेल, शिवसेना पक्षप्रमुखांसमोर तुमची जी मागणी आहे, त्यावर चर्चा करावी लागेल. यानंतर आपण मिळून योग्य तो निर्णय घेऊ, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. इतकंच काय तर गुवाहाटी बसून केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहारालाही त्यांनी टोला लगावलाय. जे काय म्हणणं आहे, ते मुंबईत येऊनच करा, अशा स्पष्ट शब्दांत संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.

ऑफर की ट्रॅप?

शिवसेना आमदारांना मुंबईत आणण्यासाठीचं हे ट्रॅप आहे का, अशी शंका आता उपस्थित केली जाते आहे. खरंच ट्रॅप आहे की ऑफर आहे, यावरुन राजकीय वर्तुळात संजय राऊतांच्या वक्तव्याचे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या आवाहनाला आता एकनाथ शिंदे गट नेमका कसा प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे पत्रकारांना सांगितलं. त्यावेळी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेतेही सोबत होते. या पत्रकार परिषदेच्या शेवटी शेवटी संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्यासाठीची शिवसेनेची तयारी असल्याचं विधान करताना बंडखोर आमदारांसमोर एक प्रस्तावही ठेवला. आता हा प्रस्ताव मान्य करत एकनाथ शिंदे गट येत्या 24 तासात मुंबईत येणार का, हा खरा प्रश्न आहे.

काल ठाकरे, आज राऊत..

काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत गुवाहाटीत बंड पुकारलेल्या आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा हेच आवाहन करताना, सरकारच्या पाठिंब्याबाबतही मोठं विधान केलं. या विधानानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून खरंत शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेईल का, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपसोबत जायचं नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम होता. ज्या प्रकारे शिवसेनेने गेल्या काळात भाजपवर टीका केली आहे. त्यानुसार संजय राऊतांची वक्तव्य तपासली, तर त्यांनी अनेकदा भाजपविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. आता बंडखोर आमदार सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यास सांगत आहेत. हा निर्णय घेतला गेला, तर भाजपसोबत शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी कितीपत तयार होईल, याबाबतही बंडखोर शिवसेना आमदारांना शंका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून आधी बाहेर पडा, मग पुढचा परतण्याचा विचार करुन, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग.
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया
तुळजापूर ड्रग्स प्रकरण; पोलीस अधिक्षक संजय जाधव यांची प्रतिक्रिया.
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश
पुणे गर्भवती प्रकरण, भिसे कुटुंबाला मानसिक त्रास, चाकणकरांकडून निर्देश.
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर
'आमच्या राजाला न्याय पाहिजे', मस्साजोगच्या ग्रामस्थांनी लावले बॅनर.