भाजपला गृहशांतीची गरज, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल; असं का म्हणाल्या?

यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात वाद होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.

भाजपला गृहशांतीची गरज, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल; असं का म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 4:23 PM

Sushma Andhare criticises BJP : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही सुरु आहेत. त्यातच आता महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जास्त जागा पदरात पाडण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

भाजपामध्ये किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मला न विचारताच माझी नियुक्ती कशी केली? अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी पक्षाकडे केली. “मला अनेक कामं दिलेली आहेत. मोठं मोठी काम करत आहे. म्हणूनच मी सुचवलं सगळीच काम मी करतोय, मला कमिटी नको. पक्षाला जे पटलं त्यांनी सुधार केला. गेली साडेपाच वर्ष कोणतंही पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे” असं किरीट सोमय्या म्हणाले.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी अमित शाहांकडे मुख्यमंत्रि‍पदाची मागणी केली आहे. “महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे. राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह यांच्यापुढे ठेवला. त्यामुळे महायुतीत यावरुन वाद होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. तसेच दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांकडून जागावाटपात जास्तीत जास्त जागा द्या, अशी मागणी होत आहे. यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात वाद होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.

“भाजपने कुठल्यातरी गृहशांतीची पूजा करायला हवी”

आता यावरुनच सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे. “सध्या भाजपला कोणत्यातरी गृहशांतीची पूजा करण्याची आवश्यकता आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. सध्या भाजपने कुठल्यातरी गृहशांतीची पूजा करायला हवी. त्याची फार आवश्यकता आहे, ते जे काही करतात त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी होत आहेत. काल किरीट सोमय्या यांनी त्यांना घरचा आहेर दिलेला आहे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

“महायुतीचा आणि त्यातील नेत्यांचा अंतर्गत प्रश्न”

“महायुतीत कोणी किती जागा मागाव्यात हा त्या महायुतीचा आणि त्यातील नेत्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही”, असेही सुषमा अंधारेंनी सांगितले. “भाजपा या सगळ्यांना वापरून घेऊन संपवत आहे. यावरून अजित दादांचे प्रवक्ते वारंवार बोलत आहेत. शिंदे गटाचे नेते बोलत आहेत, ज्याला ठेच लागेल तो शहाणा होईल. हळूहळू भाजपा काय चीज आहे हे माहिती दोन्ही लोकांना कळेल”, असेही सुषमा अंधारेंनी म्हटले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.