AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान

विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ती संपूर्ण मविआची वेदना आहे, असे म्हणत चुका झाल्यात, असं राऊतांनी मान्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हतीच, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्या चुका स्वीकारल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.

Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 10:48 AM

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ दोन दिवसांत संपला असता, तर प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला असता. मात्र जागावाटपात सगळा घोळ घातला गेला, विनाकारण वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला होता. त्यावर आता मविआतील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जागावाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीन लांबली गेली त्याची गरज नव्हती, हे आमच्या सगळ्यांचच म्हणणं आहे. ती काम, कोणामुळे आणि कशी लांबली, हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. शरद पवार असतील, जयंत पाटील किंवा आम्ही शिवसेनेचे सर्व नेते, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायाला वेळ मिळत नाही. याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यांपूर्वी जागावाटपण संपलेलं होतं,बाकी त्यांच्या चर्चा वगैरे सुरू असतीलीही पण जागावाटप संपलं होतं. विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ती संपूर्ण मविआची वेदना आहे, असे म्हणत चुका झाल्यात, असं राऊतांनी मान्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हतीच, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्या चुका स्वीकारल्या पाहिजे, अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं, आम्ही तेव्हाही सांगत होतो, पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही , असं ते म्हणाले.

वडेट्टीवार यांनी कोणाचंही स्पष्टपणे नाव घेतलं नाही, पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला. त्यावरूनही राऊतांना सवाल विचारण्यात आला. नाना पटोले आणि माझ्यात वाद झाला होता, काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या,आणि ( निवडणुकीत) काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या. ते कमी जागा जिंकले, आम्हाला 20 जागांवर विजय मिळाला, पण आता त्यावर कशासाठी वाद करायचा. जागावाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे, असं सांगत त्यांनी वडेट्टीवारांच्या विधानावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.