Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान

विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ती संपूर्ण मविआची वेदना आहे, असे म्हणत चुका झाल्यात, असं राऊतांनी मान्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हतीच, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्या चुका स्वीकारल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.

Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 10:48 AM

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ दोन दिवसांत संपला असता, तर प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला असता. मात्र जागावाटपात सगळा घोळ घातला गेला, विनाकारण वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला होता. त्यावर आता मविआतील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जागावाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीन लांबली गेली त्याची गरज नव्हती, हे आमच्या सगळ्यांचच म्हणणं आहे. ती काम, कोणामुळे आणि कशी लांबली, हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. शरद पवार असतील, जयंत पाटील किंवा आम्ही शिवसेनेचे सर्व नेते, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायाला वेळ मिळत नाही. याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यांपूर्वी जागावाटपण संपलेलं होतं,बाकी त्यांच्या चर्चा वगैरे सुरू असतीलीही पण जागावाटप संपलं होतं. विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ती संपूर्ण मविआची वेदना आहे, असे म्हणत चुका झाल्यात, असं राऊतांनी मान्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हतीच, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्या चुका स्वीकारल्या पाहिजे, अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं, आम्ही तेव्हाही सांगत होतो, पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही , असं ते म्हणाले.

वडेट्टीवार यांनी कोणाचंही स्पष्टपणे नाव घेतलं नाही, पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला. त्यावरूनही राऊतांना सवाल विचारण्यात आला. नाना पटोले आणि माझ्यात वाद झाला होता, काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या,आणि ( निवडणुकीत) काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या. ते कमी जागा जिंकले, आम्हाला 20 जागांवर विजय मिळाला, पण आता त्यावर कशासाठी वाद करायचा. जागावाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे, असं सांगत त्यांनी वडेट्टीवारांच्या विधानावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.