Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनकडे चाकरमान्यांची पाठ, रत्नागिरीत 2 ट्रेनमधून केवळ 27 प्रवाशी उतरले

गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात (Ratnagiri Special train for Ganeshotsav) आली.

कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेनकडे चाकरमान्यांची पाठ, रत्नागिरीत 2 ट्रेनमधून केवळ 27 प्रवाशी उतरले
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 8:03 AM

रत्नागिरी : गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात (Ratnagiri Special train for Ganeshotsav) आली. पण या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. काल (15 ऑगस्ट) कुर्ला टर्मिनलवरुन सुटलेली गणपती स्पेशल रेल्वे गाडी आज (16 ऑगस्ट) पहाटे रत्नागिरीत दाखल झाली. मात्र या रेल्वेमधून अवघे 11 प्रवासी रत्नागिरी स्थानकावर उतरले. तर सीएसएमटीवरुन रत्नागिरीत दाखल झालेल्या दुसऱ्या रेल्वेतूनही अवघे 16 प्रवासी उतरले.

कुर्ला टर्मिनसवरुन सुटलेली रेल्वे रत्नागिरी स्थानकात तब्बल पाऊण तास आगोदरच दाखल झालेली. काही प्रवाशांनी वैद्यकीय प्रमाणापत्र घेवून तर काहींनी स्वॅब टेस्ट करून या रेल्वेतून प्रवास केला. गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेनं विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे. गणेशोत्सवात 182 रेल्वे फेऱ्यांचे नियोजन कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात गणेशोत्सवासाठी सीएसटीवरून सावंतवाडीला जाणारी दुसरी रेल्वे रत्नागिरीत दाखल झाली. या रेल्वेमध्ये सुद्धा अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरले. दोन रेल्वेमधून अवघे 27 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरले. केवळ दोन दिवस आधी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे चाकरमान्यांनी या रेल्वेला फारसा प्रतिसाद दिला नाही.

रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर सीएसटीवरून आलेली रेल्वे सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डब्बे रिकामे पहायला मिळाले.

“गणपती स्पेशल रेल्वेचे नियोजन आधी झाले असते, तर फार चांगले झाले असते. मुंबई गोवा महामार्गावरून फरफटत गेलेल्या चाकरमान्यांचे हाल थांबले असते अशा संतप्त प्रतिक्रिया कोकण रेल्वेंनी आलेल्या चाकरमान्यांनी नोंदवल्या आहेत.”

संबंधित बातम्या :

Ratnagiri | रत्नागिरीतील खारेपाटणच्या बाजारपेठा बंदच, गणेशोत्सवात व्यापाऱ्यांवर संक्रांत

Ratnagiri Corona | रत्नागिरीचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर, 5 डॉक्टरांचे राजीनामे

बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.